
Prakash Ambedkar News : सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत झालेल्या मृत्यूचा तपास संथगतीने सुरू असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री बंगल्यावर भेट घेतली. याबाबत ॲड. आंबेडकर यांनी ट्विटद्वारे माहिती दिली.
परभणी प्रकरणातील शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांची आई, भाऊ आणि काही नातेवाईकांनी 5 जानेवारी रोजी अकोला येथे माझी भेट घेऊन तपासाच्या संदर्भात काही तक्रारी केल्या होत्या. तसेच या प्रकरणात येणाऱ्या अडचणीविषयी माहिती दिली होती. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्याचे ॲड. आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे चार मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला आहे. या प्रकरणाचा तपास मंदगतीने सुरू आहे. सरकारने हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवावे तसेच सोमनाथचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाल्यामुळे याची चौकशी न्यायालयाने करावी,ही प्रमुख मागणी आहे.
शहीद सोमनाथ सूर्यवंशी, शहीद विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी तसेच अनेकजण सूर्यवंशी कुटुंबियांना त्रास देत आहेत, त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना आंबेडकर यांनी दिली.
नवी मुंबईमध्ये एका मुलीवर अतिप्रसंग झाला होता. पीडितांच्या कुटुंबियांना त्या जागेत राहायचं नाही, म्हणून त्यांनी त्यांची जागा सरकारला देऊन त्यांना नवीन ठिकाणी सरकारने स्थलांतर करावे. याबाबत धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र सरकारने घ्यावा, अशी मागणी देखील आंबेडकारंनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.