Subhash Desai News : 'आदित्य ठाकरेंचं नाव घेताच शिंदे-फडणवीसांचे चेहरे पडले'; सुभाष देसाईंनी काढला चिमटा !

Aditya Thackeray News : धर्मा रेड्डींनी श्रेय आदित्य ठाकरेंना दिले आणि मंचावर उपस्थित शिंदे-फडणवीसांचे चेहरे पडले!
Subhash Desai News :  Aditya Thackerya
Subhash Desai News : Aditya ThackeryaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाचं आज रविवार(दि.१८ जून) वरळीत मेळावा होत आहे. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या एक दिवस आधी राज्यव्यापी शिबीर वरळीत पार पडत आहे. या मेळाव्यात नव्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) पुन्हा पक्षप्रमुखपदावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. दरम्यान या शिबिरामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री सुभाष देसाई यांनी कल्याणकारी ठाकरे सरकार या विषयावर भाष्य बोलत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

Subhash Desai News :  Aditya Thackerya
Shinde- Fadanvis Dispute : शिंदे गटाचा आणखी एक बडा मंत्री आठ दिवसात अडचणीत येणार- शिवसेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट

या शिबिराला संबोधित करताना सुभाष देसाई म्हणाले, "तिरूपती देवस्थानची मागणी होती की, आम्हाला महाराष्ट्रात एक मंदिर स्थापन करायचं आहे, त्यासाठी जमीन जमीन मिळावी. आदित्य ठाकरेंनी यासाठी पुढाकार घेतला आणि नवी मुंबईमध्ये या व्यंकटेश्वरा मंदिरासाठी जमीन उपलब्ध करून दिली. अलीकडेच याकामाचं भूमीपूजन झालं. या भूमीपूजनाच्यावेळी आपलं सरकार नव्हतं, पण तिरूपती देवस्थानचे अध्यक्ष खासदार धर्मा रेड्डी यांनी त्या कार्यक्रमात उल्लेख केला की, आज मंदिराच्या जागेचं भूमीपूजन होत आहे, ही जागा पूर्वीचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यामुळे आम्हाला मिळाली."

"धर्मा रेड्डी हे बोलत असताना त्या व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते, त्यावेळी त्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. पण धर्मा रे्डडी यांनी दोन वेळा आदित्य ठाकरेंचा उल्लेख करून, त्यांच्यामुळे हे मंदिर उभे राहणार आहे, असा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. मिलिंद नार्वेकर तिरूपती बालाजीचे विश्वस्त हे याला साक्षादार आहेत," असेही सुभाष देसाई (Subhash Desai) म्हणाले.

Subhash Desai News :  Aditya Thackerya
Ambadas Danve : अब्रुनुकसानीचा दावा करणाऱ्या सत्तारांना अब्रु तरी आहे का ? दानवेंचा घणाघात

विरोधीपक्ष नेते दानवेंचीही टीका -

या मेळाव्यात अंबादास दानवे यांनी कृषिमंत्री अंबादास दानवे यांच्यावर निशाणा साधला. "कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे सांगितले आहे. पण त्यांची अब्रु तरी शिल्लक राहिली आहे का? सत्तार दावा कधी दाखल करणार यांची आम्ही वाट पाहत आहोत," बोगस बियाणांबाबत जे छापे टाकण्यात आले त्यात मंत्र्यांचा पीए कसा आला, बियाण्यांच्या काळाबाजाराकडे शिंदे-फडणवीस सरकार दुर्लक्ष करीत आहेत, असे दानवे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com