सकाळी सत्कार झाला आणि संध्याकाळी बावनकुळेंना ठाकरेंनी टोला लगावला...

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा घेतला जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याचा समाचार
Uddhav Thackeray, Chandrasekhar Bawankule
Uddhav Thackeray, Chandrasekhar Bawankulesarkarnama

Uddhav Thackeray : मुंबई : भाजपच्या (BJP) प्रदेशाध्यक्षांच्या नावात किती कुळ आहेत, हे मला माहिती नाही. पण त्यांची कितीही कुळ आली तरी शिवसेना संपणार नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांना लगावला.

व्यंगचित्र साप्ताहिक "मार्मिक" च्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त उध्दव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या विधानाचा समाचार घेताना ठाकरे यांनी बावनकुळे यांना मार्मिक टोला लगावला. भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून बावनकुळे यांच्या नावाची शुक्रवारीच घोषणा झाली. तर आज त्यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सत्कार झाला. त्यानंतर संध्याकाळी ठाकरेंनी बावनकुळे यांच्यावर टीका केली. आता आपण परत गुलामगिरीकडे चाललो का, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.

Uddhav Thackeray, Chandrasekhar Bawankule
अमृत महोत्सव अमृतासारखा असायला हवा; उद्धव ठाकरेंचे मार्मिक टोले

प्रत्येक माणसाचे मत एकच असेल असे नाही. परंतु ८-१० दिवसापूंर्वी जे. पी. नड्डा यांनी जे वक्तव्य केले ते लोकशाहीला घातक. एकच पक्ष टिकणार इतर पक्ष संपणार. त्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या नावात किती कुळ मला माहित नाही, पण किती कुळ आली तरी शिवसेना संपणार नाही, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. सगळे मिळून संघ राज्य पद्धत. प्रादेशिक पक्ष संपवायचे हे नड्डांचे मत आहे का? मला आज राजकीय बोलायचे नाही. पण महाराष्ट्रात आपत्ती असतांना सरकारचा पत्ता नाही, मंत्र्यांचा पत्ता नाही मौज मजा सुरु आहे, अशा शब्दांत त्यांनी शिंदे सरकारला फटकारले.

Uddhav Thackeray, Chandrasekhar Bawankule
Uddhav Thackeray यांच्या डोळ्यात डोळे घालून एकनाथ शिंदे बघणार?

परवा देशाचा अमृत महोत्सव. कार्टुन कंबाईन्सने १९४७ पासून व्यंगचित्र प्रकाशित करावी अशी इच्छा. मी शिवसेनाप्रमुखांच्या व्यंगचित्रांचे पुस्तक काढू शकलो याचा आनंद आहे. सगळ बदलत पण परिस्थिती तीच आहे. देशाचा स्वातंत्र्याचा वर्धापन दिन बाळासाहेबांचे १९८० मध्ये व्यंगचित्र काढले होते. अस्वस्थ मनाची व्यथा व्यंगचित्र मांडतात. १९७८ सालचे अजून एक व्यंगचित्र, तो काळ भोगलेल्या पिढीला ते जाणवेल. मोरारजींची हेकडी वृत्ती दर्शवणारे ते व्यंगचित्र. नुकतेच प्रकाशित झालेले एक व्यगंचित्र दाखवत ठाकरे म्हणाले, 'तिरंगा आहे पण घर नाही' पण सरकार म्हणते घर घर तिरंगा. हा मार्मिकपणा आहे, असे व्यंगचित्र काढणारे आजही आहेत, असेही ठाकरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com