Badlapur School Crime Case : बदलापुरातील घटनेनंतर उज्ज्वल निकम यांची 'POCSO' आणि 'शक्ती'वर मोठी प्रतिक्रिया

Badlapur School Case : बदलापूर अत्याचार घटनेच्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची सरकारने नियुक्तीची घोषणा केली. उज्ज्वल निकम यांनी 'POCSO' आणि 'शक्ती' कायद्यावर मोठी प्रतिक्रिया दिली.
Ujjwal Nikam
Ujjwal NikamSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बदलापुरीताल अत्याचार घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची घोषणा करताच महायुती सरकारने खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे.

सरकारकडून नावाची घोषणा होताच, "पॉक्सो कायदा अधिक कडक करावा, म्हणजे त्याची जाणीव झाली पाहिजे. तसंच शक्ती विधेयकाचे लवकरात लवकर कायद्यात रूपांतर झाले पाहिजे", अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिली.

उज्ज्वल निकम म्हणाले, "बदलापुरातील घटनेनंतर लोकांचा झालेले उद्रेक मी समजू शकतो. या घटनेमुळे काही प्रश्न गांभीर्याने पुढे आले असून त्यावर चर्चा आणि कृती सरकारकडून झाली पाहिजे. लहान मुलांबद्दल अधिक काळजी घेतली पाहिजे. शाळा आणि शाळा परिसरात मुलं काय करतात, त्यातले नियम शाळांना (School) घालून दिले पाहिजे". हे करताना पॉक्सो कायदा अधिक कडक केला पाहिजे. हा कायदा किती कडक झाला आहे, याची जाणीव झाली पाहिजे. तसंच शक्ती विधेयकाचे लवकरच कायद्यात रूपांतर झाले पाहिजे, असे मत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

Ujjwal Nikam
Badlapur School Crime Case : बलात्कारी रेवण्णाची शब्बासकी विसरलो नाही; याच मोदींचेच फडणवीस आणि महाजन हस्तक...

या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतल्याचे उज्ज्वल निकम यांनी सांगितले. "सरकारने वरिष्ठ पोलिस (Police) अधिकाऱ्यांची नियुक्ती करून तपास करण्याचा आदेश दिला आहे. तपास पूर्ण होताच, खटल्याचे कामकाजासाठी माझ्याकडे येईल. या घटनेत सुरवातीला काही चुका झाल्याचा आरोप होत आहे. त्या प्रशासकीय चुका असून, खटल्यात मुख्य गुन्ह्यावर लढायचे आहे. यात आरोपीचा उद्देश काय होता, त्याचे परिणाम, समाजावर झालेला घातक, असं सर्व काही काम खटल्यात करावे लागणार आहे". अशा संवेदनशील घटनेत राजकारण आणायला नको. पोलिसांना घटनेचे गांभीर्य माहीत आहे. त्यामुळे ते कायद्यानुसारच तपास करतील. यानंतर खटल्यात समोर येणारे पुरावे, यावर अधिक काम करू, असेही उज्ज्वल निकम यांनी म्हटले.

Ujjwal Nikam
Badlapur School Case : बदलापुरातील 300 आंदोलकांवर गुन्हे, शाळांना सुट्टी, इंटरनेट बंद, पोलिस बंदोबस्तात वाढ अन् बरचं काही...

आंदोलनाला राजकीय हवा दिली गेली : एकनाथ शिंदे

बदलापूर घटनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक भूमिका घेतली आहे. आरोपीला कडक शिक्षेसाठी सरकार पीडितेच्या कटुंबियांबरोबर ठामपणे उभे आहे. या घटनेत काहीजण राजकीय स्टंटबाजी केली जात आहे. कालचे आंदोलनाला देखील राजकीय हवा होती, असा गंभीर आरोप एकनाथ शिंदे यांनी केला. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांनी बदलापूर घटनेप्रकरणी एसआयटी नेमली असून, पथकाने तपास सुरू केल्याचे सांगितले.

उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीवर टीका

दरम्यान, बदलापूरच्या घटनेत उज्ज्वल निकम यांची सरकारने नेमणूक केल्याने एकनाथ शिंदे सरकारवर टीका होत आहे. उज्ज्वल निकम सगळ्यात भपकेबाज वकील आहे. खोट्या बातम्या देऊन स्वतःबद्दल सनसनाटी निर्माण करतो, तसेच प्रसिद्धीसाठी नौटंकी करणारा वकील असल्याची टीका होत आहे.भाजपप्रणित वकिलाकडून न्याय कसा मिळणार? भाजप प्रवक्ते पदी ज्यांची नेमणूक आहे तेच राज्य सरकारचे विशेष वकील म्हणून काम कसे करणार? ही नेमणूक चुकीची आहे, अशी टीका होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com