बाळासाहेबांना तुरूगांत टाकू पाहणाऱ्या भुजबळांचे गुणगाण का गात आहेत...

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आहे.
Uddhav Thackeray Latest News
Uddhav Thackeray Latest NewsSarkarnama

मुंबई : अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवरून राजकीय वातावरण पेटले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपकडून मुरजी पटेल (Murji Patel) तर ठाकरे गटाकडून दिवंगत शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवार जाहीर झाल्यानंतर शिंदे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगत आहे.

दरम्यान, बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते आमदार किरण पावसकर यांनी राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याच्या कारणावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टोला लगावला आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. (Uddhav Thackeray Latest News)

Uddhav Thackeray Latest News
उद्धव ठाकरेंचा 'धनुष्यबाण' गेला, आता 'मशाल'ही अडचणीत...

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसाचा 'अमृत महोत्सव' सोहळा काल (ता.१४ ऑक्टोबर) मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात संपन्न झाला. या सोहळ्याला देशातील आणि राज्यातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थिती लावली होती. या मेळाव्याला ठाकरे यांनी उपस्थिती लावत भुजबळांच्या राजकीय प्रवासाचं कौतुक केलं होत. यावरूनच पावसकरांनी त्यांना टोला लगावला आहे.

पावसकर म्हणाले, ज्यांनी वडिलांना (बाळासाहेब ठाकरे) तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला. त्या भुजबळांचे गुणगाण आज उद्धव ठाकरे गात आहेत. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देत ते राजकारण करत आहेत, असा घणाघात त्यांनी केला आहे.

Uddhav Thackeray Latest News
हिजाब नाही मग बिकिनी घालायची का?; मला हिजाबवाली महिला PM म्हणून बघायचीय...

उद्धव ठाकरे यांनी भुजबळांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणात भाजप आणि शिंदे गटाला चांगल्याच कोपरखळ्या लगावल्या. तर भुजबळांच्या राजकीय प्रवासाबद्दल त्यांनी त्यांचं कौतुकही केलं होत. ठाकरेंच्या याच भाषणावरून पावसकरांनी उद्धव ठाकरेंवर टीकेचा बाण सोडला आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात भुजबळांनी कशाप्रकारे पडणार सरकार वाचवलं हे अजित पवारांनी आपल्या भाषणात सांगितलं आणि चार महिने अजून वेळ मिळाला असता तर ते मुख्यमंत्री झाले असते, असे ते म्हणाले होते. नेमका हाच धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी भुजबळ यांनी शिवसेना सोडली नसती तर ते आज मुख्यमंत्री झाले असते,असे म्हणाले.

याबरोबरच त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात संघर्ष करत जे करायचं होतं ते केलचं आणि जे काही बाळासाहेबांसोबत मतभेद होते तेही त्यांनी ते हयात असतांनाच मिटवल्याचेही त्यांनी स्पष्ट केल्याचं सांगून टाकलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com