

Nagpur News : राज्य विधिमंडळाचे उद्यापासून उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. मात्र सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच आरोप - प्रत्यारोप सुरू झाले आहे. काँग्रेसचे नेते व राज्य विधानसभेतील विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर कायदा सुव्यवस्था आणि शेतकऱ्यांची आत्महत्या या मुद्द्यावरुन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News)
नागपूर येथील राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. मात्र त्यापूर्वीच आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेतली.
वडेट्टीवार म्हणाले, "उपराजधानी नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. संत्रा नगर म्हणून नागपूरची ओळख होती. आता नागपूरला चोरांची नगरी म्हणावं, अशी स्थिती निर्माण झाली आहे. नागपूरसह विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर घरफोड्या होत असतात. उपराजधानीची ही स्थिती असेल तर राज्यात गुंतवणूक कशी येणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
शेतकरी आत्महत्यांवर बोलताना ते म्हणाले, "महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. गरिबी -बेरोजगारीमुळे या राज्यात जगणं मुश्कील झालं आहे. यामुळेही आत्महत्या वाढत आहे. महाराष्ट्रात एका वर्षामध्ये २२ हजार ७४६ आत्महत्या झाल्याची नोंदीचा आकडा समोर आला आहे. कर्जबाजारी आणि दिवाळखोरीमुळे आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. "
"कृषीमंत्र्यांचाच बीड हा जिल्हा सर्वाधिक दुष्काळी जिल्हा आहे. अशी स्थिती असताना सरकार आपल्या दारी या कार्यक्रमावर करोडो रुपये अनावश्यक खर्च केले जातात. शासनाच्या तिजोरीची लूट चालवली आहे," अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारला अधिवेशनाच्या आधीच घेरले आहे.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.