
Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी पिक विमा योजनेबाबत महत्वपूर्ण विधान केलं आहे.
एक रुपयांमध्ये पिक विमा या योजनेचा लाभ घेतानी खूप जणांनी आम्हाला चुना लावला असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. तसेच ही योजना सुरू ठेवण्याबाबत अजित पवार यांनी काही महत्त्वपूर्ण संकेत दिले.
दिशा कृषी उन्नतीची कार्यशाळा पुण्यात (Pune) गणेश कला क्रीडा मंच इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. या कार्यशाळेसाठी लोकप्रतिनिधी, शेतकरी, कृषी उद्योजक, कृषी माल निर्यातदार, कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून 'एआय'चं वापर करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. युवा संशोधक, स्टार्टअप, कृषी तज्ञ आणि शेतकऱ्यांना एकत्र आणून शेती संदर्भातील समस्यांचं आधुनिक पद्धतीने निराकरण करण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे.
दिशा कृषी उन्नतीचे या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक सक्षम कशा पद्धतीने बनवता येईल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभ्या असून शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना सरकार आणणार आहे. मी शेतकरी कुटुंबात जन्माला आलो आहे. त्यामुळे शेतकरी ही आमची जात दुसरी जात आम्हाला माहिती नाही, असं अजित पवार म्हणाले.
सरकार शेतकऱ्यांच्या संदर्भात नवनवीन योजना आणि संकल्प आणत आहे. मात्र काही योजनांमध्ये बदल करण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला आहे. आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पिक विमा देण्याची योजना सुरू केली होती. मात्र त्या योजनेमध्ये खूप जणांनी आम्हाला चुना लावला. त्याबाबतच सर्व तपशील आम्ही काढला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह एक बैठक घेतली आहे. त्यामध्ये काही नवीन कल्पना अमलात आणून एक चांगला कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी देणार आहोत. त्या दिवशी कोणातून लवकरच निर्णय घेण्यात येणार असून त्याबाबतची कल्पना शेतकऱ्यांना देण्यात येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुरंदर विमानतळाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, आगामी काळात विकासाच्या दृष्टिकोनातून पुरंदर विमानतळ हे महत्त्वाचे आहे मात्र या विमानतळाला सात गावांचा विरोध आहे. शेतकऱ्यांचा विरोध आम्ही समजू शकतो मात्र त्यांना मोठ्या प्रमाणात आम्ही मोबदला देणार असून जेणेकरून त्या भागातील शेतकरी इतरत्र शेती विकत घेऊ शकता असं अजित पवार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.