Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीचे कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच सांगितले आहे.
अजित पवार Ajit Pawar म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या जवळील अमोल काळे यांचे निधन झाले आहे. त्यांच्या अस्थिविसर्जनासाठी देवेंद्र फडणवीस नाशिकला जायचे होते. ते दोन तीन दिवस दु:खात होते. तर, आदल्या दिवशी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांना सांगितले की उमेदवाराचे नाव निश्चित करून फाॅर्म भरायला आम्ही जाणार आहोत. सगळ्यांनी तेथे असावे असे मला वाटत नाही. मुख्यमंत्र्यांनी देखील महायुती तुमच्या सोबत आहे. तुम्ही जाऊन फाॅर्म भरा, असे सांगितले.
कोणी दु:खात असताना फाॅर्म भरायला बोलवणं मला योग्य वाटलं नाही. तसेच ही निवडणूक बिनविरोध होणार होती. एका बाजुला 200 मतं होती. तर, दुसऱ्या बाजुला 70-75 मतं होती. त्याच्यामुळे आम्ही गेलो.आमच्या प्रमुख लोकांच्या उपस्थित उमेदवारी अर्ज भरला. आत चौघांनाच एन्ट्री असते. त्यामुळे प्रफुल पटेल, सुनील तटकरे, नरहरी झिरवळ, छगन भुजबळ तेथे उपस्थित होते.
भुजबळ नाराज असल्याच्या बातम्या धादांत खोट्या असल्याचे देखील अजित पवार यांनी ठणकावून सांगितले. भुजबळ Chhagan Bhujbal यांनी स्वतः सांगितले की नाराज नाही. पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाने नाव निश्चित केले, असे देखील अजित पवार म्हणाले. तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका लोकसभा निवडणुकीत बसल्याची कबुली देखील पवार यांनी दिली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.