
धायरी परिसरातील डीपी रोडचे काम अनेक महिन्यांपासून प्रलंबित असून नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत.
स्थानिक ग्रामस्थांनी बॅनरद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धायरीला दौऱ्यासाठी बोलावले, आणि त्यांच्याकडून काम पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
वाहतूक कोंडी आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नागरिकांनी तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे.
Pune news: पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी आणि पहाटेचे दौरा राज्यातील जनतेला सर्वश्रृत आहे. विविध कामांची पाहणी, उद्धघाटनं यासाठी अजित पवार यांचा सकाळीच दौरा असतो. अजितदादा सकाळी सहा वाजता विकासकामांची पाहणी करण्यासाठी येणार म्हणून अधिकाऱ्यांची धावाधाव होत असते.
अशातच पुण्यात एका बॅनरने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. धायरीच्या डीपी रोडच्या कामाबाबत हा फलक लावण्यात आला आहे. पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजितदादांना या माध्यमातून विनंती करण्यात आली आहे.
धायरी परिसरातील डीपी रोडचे काम अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. नागरिकांनी याबाबत अनेक वेळा आपले म्हणणे प्रशासनाकडे मांडले, पण त्याची दखल घेतली नाही. धायरीचा डीपी रोड केवळ आश्वासनांत न राहता तातडीने पूर्ण व्हावा, असे मागणी धायरी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत नागरिकांनी ठाम भूमिका घेतली आहे.
“दादा एक पहाटेचा दौरा धायरीच्या डीपी रोडला पण होऊन जाऊ द्या की. दादा तुम्ही आल्यानंतरच धायरीचा डीपी रोड होणार आहे.” अशा आशयाचे बॅनर लावत खास पुणेरी टोला धायरकरांनी लगावला असून अजितदादांना चिमटा काढला आहे. हा फलक वाचून नागरिक मिश्किल प्रतिक्रिया देत आहेत.
धायरी परिसरातील वाहतूक कोंडी, अपुऱ्या रस्त्यांची अवस्था आणि वाढती लोकसंख्या यामुळे डीपी रोडचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासन तसेच संबंधित लोकप्रतिनिधींना त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. धायरी गावाचा डीपी रोड प्रत्यक्षात आल्याशिवाय नागरिक शांत बसणार नाहीत असा इशारा धायरी गाव डीपी रोड वेल्फेअर ट्रस्ट यांच्या वतीने देण्यात आला आहे.
Q1. धायरी डीपी रोडचे काम किती दिवसांपासून प्रलंबित आहे?
👉 अनेक महिन्यांपासून हे काम प्रलंबित असून नागरिक त्रस्त झाले आहेत.
Q2. नागरिकांनी आपली मागणी कशी व्यक्त केली?
👉 नागरिकांनी बॅनर लावून अजित पवार यांना धायरीला दौरा करण्याची विनंती केली.
Q3. धायरीत डीपी रोड का महत्त्वाचा आहे?
👉 वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या रस्त्यांमुळे डीपी रोड आवश्यक आहे.
Q4. नागरिकांचा पुढील इशारा काय आहे?
👉 डीपी रोडचे काम प्रत्यक्षात सुरू झाले नाही तर नागरिक शांत बसणार नाहीत असा इशारा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.