Aadhalrao Patil : पराभवानंतर आढळरावांची आगपाखड! म्हणाले, 'बिनकामाचा माणुस निवडून दिला ही लोकशाहीची चेष्टा'

Shirur Loksabha Election 2024 : शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी अखेरच्या दोन ते तीन दिवसांत अजित पवार यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी जाहीर सभा देखील घेतल्या होत्या.
MP Amol Kolhe - Shivaji Aadhalrao Patil
MP Amol Kolhe - Shivaji Aadhalrao PatilSarkarnama

Shirur News : शिरुर लोकसभेच्या निवडणुकीत जातीपातीचे राजकारण झालं. यामध्ये आपला बळी गेल्याची खंत व्यक्त करतानाच लोकसभेच्या निवडणुकीत बिनकामाच्या माणसाला निवडणून दिलं जातं, ही लोकशाहीची चेष्टा आणि थट्टा असल्याचा घणाघात शिरुर लोकसभा मतदारसंघाचे पराभूत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला.

शिरुर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या अगोदर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणाऱ्या आढळराव पाटील यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत आढळराव पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे शिरुर लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या पाच विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पाठींबा दिलेल्या आमदारांचे वर्चस्व असतानाही शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. कोल्हे यांना या सर्वच मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळाले.

या मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तर या निवडणुकीत कसा निवडून येतो, ते बघतोच, असे आव्हान महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कोल्हे यांना देत निवडणुकीत कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणारच, असे जाहीर सभेत वारंवार सांगितले होते. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघानंतर सर्वांचे लक्ष लागलेला हा मतदारसंघ होता. या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी अखेरच्या दोन ते तीन दिवसांत अजित पवार यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी जाहीर सभा देखील घेतल्या होत्या.

MP Amol Kolhe - Shivaji Aadhalrao Patil
Dr Amol Kolhe Lok Sabha winner : होय, मी खासदार होऊन दाखवलंच! शिरूरमध्ये आढळरावांचा नाही तर अजितदादांचा पाडाव

या निवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजुने कौल देत डॉ. कोल्हे यांना विजयी केले. या निवडणुकीत झालेला पराभव आढळराव पाटील यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. आपल्या मनातील सल आढळराव पाटील यांनी मंचर येथील सहविचार सभेत बोलून दाखविली. ते म्हणाले, या निवडणुकीत विकासकामांना प्राधान्य न देता बिनकामाचा माणुस अशी लढत झाली. यामध्ये जातीपातीच्या राजकारणाची खेळी खेळली गेली. बिनकामाचा माणूस मतदारांनी विजयी केला. ही लोकशाहीची चेष्ठा आणि थट्टा असल्याची टीका आढळराव पाटील यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com