

पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा जाहीरनामा तयार असून तो लीक केल्यास पक्षशिस्तीची कारवाई होईल, असा मिश्किल टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
भाजपशासित महानगरपालिकांमध्ये विकासाच्या नावाखाली शहरांचा विनाश, पर्यावरणाचा ऱ्हास आणि नागरिकांचे प्रश्न वाढल्याचा आरोप त्यांनी केला.
शिवसेना सत्तेत आल्यास पर्यावरण संरक्षण, पाणी, वाहतूक व आरोग्य या मूलभूत प्रश्नांवर भर दिला जाईल, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले.
Pune, 20 December : पुणे महापालिका निवडणुकीचा जाहीरनामा तयार आहे. मात्र, मी आज त्यातील काही गोष्टी लिक केल्या, पेपर फोडला तर दोन्ही शहरप्रमुख माझ्यावर पक्षशिस्त भंगाच्या कारवाईचा प्रस्ताव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवतील, असे मिश्किल विधान युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी (ता. २०) पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले.
पुणे शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Shivsena UBT) वतीने महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. २० डिसेंबर) आदित्य ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, वसंत मोरे उपस्थित होते. माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी ‘भाजपने गेल्या निवडणुकीत दिलेला जाहीरनामा आणि त्यातील न झालेली कामे यांचे सादरीकरण केले.
आदित्य ठाकरे म्हणाले,‘‘भाजपशासित सर्व महानगरपालिकांमध्ये शहरांचा झालेला विनाश हा विकास म्हणून दाखविला जात आहे. लहान लहान पावसांनही शहरं तुंबत आहेत. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवसेना सत्तेत आल्यावर शहराच्या पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देणार नाही.
ज्या ज्या ठिकाणी सत्ता आहे, त्या शहरांचा भाजपने विद्ध्वंस करून ठेवला आहे. वाहतूक कोंडी, आरोग्य, पाणी, खड्डे, आणि छोट्या पावसाने तुंबणारी शहरे अशी ओळख निर्माण झाली आहे. पुण्यामध्ये मुळा मुठा नदीपात्र विकासाच्या नावाखाली आक्रसले गेले आहे. यामध्ये ११ मंंदिरे आणि चार रस्ते पाण्याखाली जात आहेत, असा दावा ठाकरेंनी केला.
नाशिकमध्ये तपोवनमधील वृक्षतोड सुरू केली आहे. हा सगळा विनाश विद्ध्वंस भाजप सरकार विकास म्हणून दाखवित आहेत. हा असा विनाशकारी विकास शिवसेनेनेला मान्य नाही. आम्ही सत्तेत आल्यावर शहरांच्या पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देणार नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
1) प्रश्न: पुणे महापालिकेचा शिवसेनेचा जाहीरनामा तयार आहे का?
उत्तर: होय, जाहीरनामा तयार असून तो लवकरच जाहीर केला जाणार आहे.
2) प्रश्न: जाहीरनामा लीक केल्यावर काय होईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले?
उत्तर: पेपर फोडल्यास शहरप्रमुख पक्षशिस्तभंगाची कारवाई सुचवतील, असा टोला त्यांनी लगावला.
3) प्रश्न: आदित्य ठाकरे यांनी भाजपवर मुख्य आरोप काय केला?
उत्तर: विकासाच्या नावाखाली शहरांचा आणि पर्यावरणाचा विनाश केल्याचा आरोप केला.
4) प्रश्न: शिवसेनेची शहरी विकासाबाबत भूमिका काय आहे?
उत्तर: सत्तेत आल्यावर पर्यावरणाचा ऱ्हास थांबवून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर भर देण्याची भूमिका आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.