Vijay Wadettiwar News : बोकड कापून वाटे पाडायचे आणि ताव मारण्यासाठी टपून बसायचं! वडेट्टीवारांनी सांगितला सत्ताधारी नेत्यांचा फॉर्म्यूला

Vijay Wadettiwar slams Maharashtra government leaders : सध्या राज्य सरकारमधील तिन्ही पक्ष सत्तेच्या वाट्यासाठी भांडताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या सरकारमधील नेत्यांना आपापल्या वाट्याचं पडला आहे जनतेचे काही पडलेलं नाही, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
Vijay Wadettiwar News :
Vijay Wadettiwar News :Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : महायुती सरकार मधील राज्यमंत्री आपल्याला पुरेसे अधिकार मिळत नसल्याने अस्वस्थ असल्याचं सांगितलं जात आहे. या राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली आहे. आम्हालाही विशिष्ट अधिकार द्या, मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहण्याची परवानगी द्या, अशा मागणीचे निवेदन राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यावरून काँग्रेस नेते विजय विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, राज्य सरकारमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे. तिन्ही पक्षांमध्ये कोणताही ताळमेळ असल्याचा दिसत नाही. सामान्य लोकांच्या प्रश्नासाठी हे सरकार भांडताना दिसत नाही. मात्र हिस्से वाटपासाठी नेते मंडळी भांडताना पाहायला मिळत आहेत. एखादं बोकड कापल्यानंतर ज्या पद्धतीने वाटे पडतात त्या पद्धतीने सध्या सरकारमध्ये वाटे पडत असून त्यावरती ताव मारण्यासाठी प्रत्येकजण टपून बसला आहे. सध्या असे चित्र पाहायला मिळत आहे.

राज्य सरकार कुठे घेऊन चाललेत हा महाराष्ट्र आणि कुठल्या खाईत ढकलून देणार आहेत, ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारमधील लोकांना थोडी तरी लाज शरम असेल तर त्यांनी शोषित पीडितांचा विचार करावा. सत्तेसाठी हावरटपणा करून मतांची चोरी करून सत्तेत बसलेल्या सरकारला जनतेच्या भावनांशी काही पडलेलं नाही, हे आता स्पष्ट झाले असून सध्या राज्य सरकारमधील तिन्ही पक्ष सत्तेच्या वाट्यासाठी भांडताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या सरकारमधील नेत्यांना आपापल्या वाट्याचं पडला आहे जनतेचे काही पडलेलं नाही हे यातून दिसत आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

Vijay Wadettiwar News :
Top 10 News : राहुल गांधी, राऊत पोलिसांच्या ताब्यात... उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक... धनखड नजरकैदेत, खासदाराचा 'लेटर बाॅम्ब'; वाचा महत्वाच्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून काढण्यात आलेल्या मंडल यात्रेवर भाजपकडून टीका करण्यात येत आहे. वडेट्टीवार म्हणाले, मंडल आयोगाबाबत बोलण्याचा अधिकार भाजपला नाही. ज्यावेळेस मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करा, अशी मागणी करण्यात आली तेव्हा या लोकांनी त्याला विरोध केला होता. त्यामुळे मंडल आयोगाबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार या सत्ताधाऱ्यांना नाही, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar News :
Mumbai model Pune post : मुंबईच्या धर्तीवर आता पुण्यातही 'या' पदाची निर्मिती करावी; मुख्यमंत्र्यांकडे काँग्रेसचे साकडे

निवडणूक झाल्यानंतर जेव्हा ईव्हीएम बाबत आरोप करण्यात आले तेव्हा त्यांनी पुरावे मागितले आणि आता पुरावे दिल्यानंतर याला इतका उशीर का झाला म्हणून टीका करत आहेत. हे सत्ताधारी बेईमान असून उद्योगपतींना सांभाळणारी जमात निर्माण झाली आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com