'मुख्यमंत्री येऊन भाषणं देऊन जातील पण...' Jayant Patil यांनी माहोलच बदलला।Ishwarpur News।

'निधी कमी पडू देणार नाही, मग नऊ वर्षं काय केलं?' - पाटीलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

सांगलीच्या ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकी निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ईश्वरपूर शहराच्या विकासासाठी भाजपाला साथ देण्याचा आवाहन करत जयंत पाटलांवर टीका करणे टाळत,शहराच्या विकासाला आपलं प्राधान्य असल्याचे स्पष्ट केलं.. यावर जयंत पाटील यांनी प्रतिउत्तर देत म्हणाले. अनेक मुख्यमंत्री मंत्री येतील आश्वासन देतील पण या शहराची काळजी मलाच घ्यायची आहे. आता येऊन मुख्यमंत्री बोलून गेले. ईश्वरपूर ला निधी कमी पडू देणार नाही मग नऊ वर्ष काय केले..त्यामुळे या सगळ्याचा उद्देश तुमचा प्रश्न सोडवण्याचा नाही. त्याचा उद्देश माझा पराभव करण्याचा आहे. पण ईश्वरपूर जनतेने मला आयुष्यभर सांभाळले आहे. जेवढ्या मला शिव्या जास्त देतील तेवढी मत जास्त पडतील. असे जयंत पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com