
Mumbai News : महाराष्ट्राच्या राजकारणाचा आजपर्यंतचा इतिहास पहिला तर राज्यात मुख्यमंत्री पदाची धुरा संभाळणाऱ्या पाच माजी मुख्यमंत्र्यानंतर मंत्री होणे पसंत केले आहे. महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस गेली अडीच वर्ष उपमुख्यमंत्री होते. तर आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे आता उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे या पूर्वी 2014 ते 2019 या काळात फडणवीस हे राज्याचे सलग पाच वर्ष मुख्यमंत्री होते. वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्ष या पदावर राहणारे ते पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. (Mahayuti News)
महायुती सरकारला राज्यातील जनतेने मोठ्या बहुमताने पुन्हा एकदा सत्ता दिली आहे. त्यानंतर सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपचे (Bjp) देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी गुरुवारीच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भाजपने मुख्यमंत्रिपद नाकारल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारायला नकार दिला होता. मात्र, शेवटच्या क्षणी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची तयारी दाखवली आहे, त्यामुळे शिंदे यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर, नारायण राणे, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे अशा पाच माजी मुख्यमंत्र्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे 1985 ते 1986 या काळात राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर ते आघाडी सरकारच्या काळात राज्यातील पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये महसूल मंत्री होते.
नारायण राणे हे 1998 ते 1999 या भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी ते विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात काही काळ महसूल मंत्री होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. गेल्या टर्ममध्ये ते केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री होते.
अशोक चव्हाण हे आघाडी सरकारच्या काळात दोन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. ते 2008 ते 2009 व त्यानंतर 2009 ते 2010 या काळात राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री होता आले नाही. 2019 मध्ये आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये ते 2019 ते 2022 या काळात राज्याचे महसूल मंत्री होते.
देवेंद्र फडणवीस हे 2014 ते 2019 साली पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते. 2019 च्या निवडणुकीत त्यांना मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे ते काही काळ राज्याचे विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर 2022 साली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारमध्ये ते गृहमंत्री व उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर आता राज्यात महायुती सरकारला पूर्ण बहुमत मिळाल्याने ते पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
एकनाथ शिंदे हे 2022 ते 2024 या काळात राज्याचे मुख्यमंत्री होते. आता ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यापूर्वी ते 2014 ते 2019 या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकरमध्ये ते मंत्री होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.