Eknath Shinde 2 Sarkarnama
महाराष्ट्र

Eknath shinde : एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार का ? फडणवीसांचं मोठं विधान; सस्पेन्स कायम

Mahayuti Press Conference : बुधवारी दुपारी महायुतीकडून सरकार सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. दरम्यान, यावेळी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ट्विस्ट आला आहे.

Sachin Waghmare

Mahayuti PC : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार, याची अधिकृत घोषणा झाली. पण त्याआधीच भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे तेच राज्याचे मुख्यमंत्री असणार आहेत. त्यानंतर लगेचच बुधवारी दुपारी महायुतीकडून सरकार सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. दरम्यान, यावेळी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ट्विस्ट आला असून नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकरण्याबाबत रात्री उशिरा निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केल्याने सस्पेन्स वाढला आहे. (Eknath shinde News)

राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची महायुतीच्या नेत्यांनी भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणारे पत्र दिले. यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यपालांना पत्र देण्यात आले. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), अजित पवार उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का ? असा सवाल विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी रात्रीपर्यंत थांबा, असे सांगत उपमुख्यमंत्री पद स्वीकरण्याबाबतचा सस्पेन्स वाढवला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे रात्री काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांना मंत्रिमंडळात राहावे अशी विनंती केली. त्यांच्या आमदारांचीही तीच विनंती आहे. त्यांचा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे'. त्यामुळे एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहणार की नाही? याबाबतचा मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. “तिघांची शपथ होईल. आणखी कोणाचा होणार हे बुधवारी संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊ. कोण कोण शपथ घेणार याची माहिती संध्याकाळी देईल. गेल्या अडीच वर्षात आम्ही तिघांनी मिळून निर्णय घेतले आहे. पद ही तांत्रिक गोष्ट आहे. पण आम्ही यापुढेही तिघे मिळूनच निर्णय घेणार आहोत, असे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

आताच आम्ही महायुतीच्या वतीने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पत्र दिले आहे. नियमानुसार, राज्यात नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्याकरता आमचा दावा सादर केला आहे. राज्यपालांनी आमचा दावा घेतल्यानंर आम्हाला 5 तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजचा शपथविधीची वेळ लिहून दिली आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य, स्वाभिमान, रासप आणि अपक्ष अशी एक मोठी महायुती झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, बुधवारी सकाळी कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपचे निरीक्षक निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नेत्यांनी फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडल्याचे समजते. त्यावर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आता आमदारांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार हे फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. तर रवींद्र चव्हाण यांनी त्याला अनुमोदन दिले. त्यानंतर बहुमताने फडणवीसांचे नाव निश्चित करण्यात आले. त्यानंतर आता भाजप आमदारांच्या बैठकीमध्ये फडणवीस यांच्याच नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT