Raigad, 11 April : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उद्या (ता. १२ एप्रिल) रायगडच्या दौऱ्यावर येणार आहेत. रायगडला आल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनाला जाणार आहेत. रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. पण, शाह यांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आमदाराने महायुतीच्या नेत्यांना खणखणीत इशारा दिला आहे, त्यामुळे कोकणात विशेषतः रायगडमध्ये शाहांच्या दौऱ्याआधीच महायुतीत खडाखडी रंगण्याची चिन्हे आहेत.
रोजगार हमी योजना मंंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांना पालकमंत्री न केल्यास रायगडमध्ये उठाव निश्चितपणे होणार आहे, त्यात काही चिंता करण्याची गरज नाही. मागच्या सरकारचे जे परिवर्तन झाले, ते रायगडमधून झालं. आम्ही छत्रपतींचे मावळे असल्याने हा अन्याय कधीही सहन करणार नाही. पण, आम्हाला वाटतंय की योग्य वेळी, योग्य निर्णय होईल आणि गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होतील, अशी पेक्षा आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केली आहे.
आमदार दळवी म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) दौऱ्यानंतर रायगडला निश्चितपणे न्याय मिळेल, असं मला वाटतं आणि तो न्याय आमच्या बाजूंनी असेल, कारण आम्ही सारे आशावादी आहोत. जनतेने जो मॅटेंड दिले आहे, त्याचा आदर निश्चितपणे करतील, त्यामुळे आम्ही ‘वेट ॲन्ड वॉच’च्या भूमिकेत आहोत. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर रायगडचे पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांच्या नावाची घोषणा निश्चितपणे होईल.
सुनील तटकरे यांच्या घरी केंद्रीय मंत्री अमित शाह हे भोजनासाठी जाणार आहेत. तरीदेखील आम्ही आशावादी आहेात. ते जेवायला कुठे गेले आणि भेटीला कुठे गेले. यापेक्षा ते शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी येत आहेत, हे महत्वाचे आहे. ते रायगडला न्याय देतील. कारण, गोगावले हे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहेत, त्यामुळे भरत गोगावले यांच्या रुपाने पालकमंत्रिपद मिळेल, त्यातून तमाम रायगडवासियांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा आमदार दळवी यांनी व्यक्त केली.
महेंद्र दळवी म्हणाले, महाविकास आघाडी आणि महायुतीच्या काळात रायगडावर नेहमीच अन्याय झाला आहे. पण आता रायगडला जाग आली आहे, असं वाटतं. अमित शाह यांच्या उद्याच्या दौऱ्यानंतर रायगडचे पालकमंत्रिपद जाहीर होईल, असे मला वाटतं.
सुनील तटकरे यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेत्याला हे समजायला पाहिजे, असे आम्हाला वाटतं. रायगडच्या जनतेने जो अधिकार दिला आहे, तो अधिकार पालकमंत्रिपदाच्या स्वरूपात भरत गोगावले यांना मिळायला पाहिजे. त्यामुळे मी मागच्या वेळीच सांगितलं होतं की हा काही भातुकलीचा खेळ नाही. वरिष्ठ आणि बुजुर्ग नेत्यांनी त्याचा विचार निश्चितपणे करावा, असे आवाहनही आमदार दळवी यांनी केले.
भरत गोगावले यांच्याकडे पालकमंत्रिपद न आल्यास रायगडमध्ये उठाव निश्चितपणे होणार आहे, त्यात काही चिंता करण्याची गरज नाही. मागच्या सरकारचे जे परिवर्तन झाले, ते रायगडमधून झालं. आम्ही छत्रपतींचे मावळे असल्याने हा अन्याय कधीही सहन करणार नाही. त्यामुळे आम्हाला वाटतंय की योग्य वेळी योग्य निर्णय होईल आणि भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होतील, अपेक्षा आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.