Rahul Gandhi-Chandrashekhar Bawankule Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bawankule VS Gandhi : राहुल गांधींनी फक्त कामाठी मतदारसंघाचा अभ्यास करावा; म्हणजे काँग्रेस कशी पराभूत झाली, हे समजेल : बावनकुळे

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणूक आयोगाने घरोघरी फिरून सगळ्या भागात नोंदणी केली आहे. मतदार नोंदणी निरंतर होत असते. त्यामुळे मतदार वाढतच असतात. राहुल गांधी यांनी लेख लिहिण्यापूर्वी आत्मपरीक्षण करायला पाहिजे होते.

Rajesh Charpe

Nagpur, 07 June : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लेखाची सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राची विधानसभा भाजपने चोरली, असा थेट आरोप त्यांनी केला आहे, त्यामुळे भाजप नेते चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. गांधी यांनी केलेला दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खोडून काढला आहे. पराभवाच्या मानसिकतेतून राहुल गांधी अजूनही बाहेर येत नाही, त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे, असा सल्ला देऊन बावनकुळे यांनी फक्त कामठी विधानसभा मतदरासंघाचा मागील तीन निवडणुकीचा जरी अभ्यास केला तरी त्यांना काँग्रेस का पराभूत झाली, हे लक्षात येईल, असाही टोला लगावला.

आपल्या कामठी विधानसभा मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत सुमारे ३० हजार मतांनी वाढ होत आहे. पनवेल विधानसभा साडेसहा लाखांवर गेली आहे. पिंपरी-चिंचवड साडेपाच लाखांवर गेली आहे, अशा पंधरा विधानसभा मतदारसंघात सातत्याने मतदारांची वाढ होत आहे. लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीत महाष्ट्रात ७ कोटी २९ लाख मतदार होते. तेव्हा देशात काँग्रेसची सत्ता होती. त्यानंतर ३० लाख मते वाढली. निवडणूक आयोगाने घरोघरी जाऊन नोंदणी केली होती. याद्या दुरुस्त केल्या आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले

कामठी विधानसभेच्या काँग्रेसने (Congress) आपल्या बूथवर १७ हजार मतदारांची नोंदणी केली आहे. निवडणूक आयोगाने घरोघरी फिरून सगळ्या भागात नोंदणी केली आहे. मतदार नोंदणी निरंतर होत असते. त्यामुळे मतदार वाढतच असतात. राहुल गांधी यांनी लेख लिहिण्यापूर्वी आत्मपरीक्षण करायला पाहिजे होते.

लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या होत्या. महायुती १७ जागांवर थांबली होती. जिंकल्याच्या नादात काँग्रेस सारंकाही विसरून गेली. महायुती कामाला लागली. जनसंवादाचे काम केले. मोदींच्या नेतृत्वार मतदारांनी विश्वास ठेवला. विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने तीन कोटी १७ लाख मते आम्ही महायुकीडे वळविण्यात यशस्वी झालो. काँग्रेस आघाडी दोन कोटी १७ लाखांवर येऊन थांबली. ती कमी का झाली याचे आत्मपरीक्षण त्यांनी करायला हवे.

राहुल गांधी अजूनही पराभवाच्या गडद छायेत आहेत. तो जोपर्यंत यातून बाहेर निघत नाहीत, तोपर्यंत काँग्रेसचे काही खरे नाही. केवळ आरोप करून व दुसऱ्याला दोष देऊन निवडणूक जिंकता येत नाही. त्यासाठी अभ्यास करण्याची गरज आहे. फक्त कामठी विधानसभा मतदारसंघाचा पंधरा वर्षांचा इतिहास आणि मागील निवडणुकीतील ट्रेंड बघितला तरी त्यांना त्यांच्या पराभवामागचे कारण समजेल, असेही बावनकुळे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT