Devendra Fadnavis uddhav Thackeray Raj Thackeray .jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: ठाकरे बंधू एकत्र येणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

Devendra Fadnavis reaction News : गेल्या महिनाभरापासून या दोन पक्षाचे मनोमिलन अंतिम टप्प्यात आले असल्याचे समजते.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव-राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. गेल्या महिनाभरापासून या दोन पक्षाचे मनोमिलन अंतिम टप्प्यात आले असल्याचे समजते. त्यातच शुक्रवारी प्रसार माध्यमाशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मनसे-शिवसेना युतीबाबत सूचक विधान केले आहे. हे दोन्ही बंधू एकत्र येणे ही महाराष्ट्राची गरज असल्याचे सांगत शिवसैनिक आणि मनसैनिक यांनी आनंद व्यक्त केला असतानाच त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली

मनसेसोबतच्या युतीबाबत पत्रकार परिषदेतच उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. महाराष्ट्रच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल, असे स्पष्ट करीत लवकरच युतीबाबत संदेश नाही तर थेट बातमीच देणार असल्याचे सांगितल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे. त्यानंतर शिवसेना-मनसे एकत्र येण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, 'मी आत्ताच यावर प्रतिक्रिया देणार नाही. ठाकरे बंधूंच्या युतीवर मी योग्य वेळी बोलेन. कारण या दोघांच्या युतीशी माझा काहीही संबंध नाही. त्यामुळे माझ्या राजकीय अनुभवावरुन मी योग्य वेळी बोलेल.'

याबाबत राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रतिक्रया जाणून घेतली असता ते म्हणाले, 'सब कुछ लुटा कर मिला तो क्या हुआ' अशी डायलॉगबाजी केली. मनसे आणि शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाच्या युतीमुळे काय फरक पडणार नसल्याचे मत व्यक्त केले.

मनसे आणि शिवसेना एक होऊ द्या ना, पण लोकं विकास बघतात. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकास बघतात. त्यामुळे लोक आमच्याबरोबर आहेत. भाजप हा स्वतःला राष्ट्रवादी, राष्ट्रप्रेमी पक्ष म्हणतो, राष्ट्राचे नियम आणि सिद्धांत आहे, त्याप्रमाणे आम्ही चालणार असेही मंगलप्रभात लोढा म्हणाले.

दरम्यान, मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीबाबत बोलताना खासदार संजय राऊत यांनी म्हणाले की, ‘राज ठाकरे यांचे घर आमच्यासाठी दुसरे घर आहे, आम्ही युतीबाबत सकारात्मक आहोत, म्हणून खाली कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे. नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT