Mudhoji Bhosale on Reservation: आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. मनोज जरांगे यांनी केलेल्या सरसकट आरक्षणाच्या मागणीच्या विरोधात नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाने साखळी उपोषण सुरू केले आहे. यावर मुधोजी भोसले यांनी धाडसी मत व्यक्त केले. ते म्हणाले, आज मराठा समाज आरक्षण मागत आहे, उद्या ब्राम्हण समाज मागेल. या मागणीवरून संघर्ष दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. त्यापेक्षा आरक्षण सर्वांसाठी संपले तर चांगले होईल. आरक्षणाची ही भानगडच संपली पाहिजे असे मला वाटते. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविली आहे.
मुळात आरक्षण १० वर्षांसाठी लागू झाले होते. फक्त राजकीय पुढाऱ्यांनी ते आपल्या सोयीसाठी कायम ठेवले. आरक्षण सरसकट रद्द झाले तर हुशार विद्यार्थ्यांना संधी मिळेल, मग तो कुठल्याही समाजाचाच असो. आरक्षणाची भानगड संपली पाहिजे असे मला वाटते असे सांगून मुधोजी भोसले यांनी सोबतच ज्यांच्या गॅझेटमध्ये मराठा-कुणबी नाही त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी केली. आरक्षणाच्या विरोधात मत व्यक्त करताना त्यांनी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचीही मागणी केली. त्यामुळे त्यांच्या मतावर मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
मनोज जरांगे यांच्या सरसकट आरक्षणाच्या मागणीला असहमती दर्शवणारे मुधोजी भोसले यांनी आता ज्यांच्या गॅझेटमध्ये नोंदी नाहीत त्या सर्व मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी केली आहे. मराठा म्हणूनच आम्हाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि ते टिकाऊ असले पाहिजे. कोणाच्या आरक्षणात मराठा समाजाला वाटेकरी करू नये, मराठा समाजासाठी विशेष प्रवर्ग निर्माण करून आरक्षण दिले पाहिजे असे ठाम मत त्यांनी सध्या राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावर व्यक्त केले.
मुधोजी भोसले यांनी यापूर्वीसुद्धा मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी केली होती. मराठा समाजाच्यावतीने राज्यभर काढण्यात आलेल्या मूक मार्चातही संपूर्ण भोसले घराणे सहभागी झाले होते. मनोज जरांगे मुंबईत आंदोलनाला बसल्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना मराठा समाजाला ओबीसीतून नव्हे तर स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी केली होती.
मुंबईत जरांगे यांच्या आंदोलनात हजारो बांधव सहभागी झाले आहे. ज्या ठिकाणी आंदोलन होत आहे, त्या भागातील लोकांना काही त्रास होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे आंदोलनावर सरकारने लवकर तोडगा काढणे आवश्यक आहे. आंदोलनात गेलेल्या तरुणांनी शांततेने आंदोलन कारावे असे आवाहन करून त्यांनी आंदोलनाची एकी कायम राहिली पाहिजे. आंदोलन पुढे वाढत जाताना मागण्यांमध्ये काही अंतर पडत जाते. आजची परिस्थिती बघता ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य वाटत नाही. मात्र ज्यांच्याकडे कुणबी मराठा म्हणून दस्तावेज आहे, त्यांना सरकार ओबीसीमध्ये घेण्यास तयार आहे, त्यांना घेतलेच पाहिजे. मात्र ज्यांच्याकडे दस्तावेज नाही, त्यांना ओबीसीमधून आरक्षण देणे शक्य नाही त्यांचा वेगळा विचार सरकारने करावा असेही मुधोजी भोसले यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.