Jayant Patil-Shahu Maharaj Chhatrapati Sarkarnama
मुंबई

Mahavikas Aghadi News : महाविकास आघाडीत कोल्हापूरची जागा कोणाला मिळणार? जयंत पाटलांनी उघडले गुपित

Vijaykumar Dudhale

Mumbai News : महाविकास आघाडीचे लोकसभा मतदारसंघाचे जागावाटप निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कोल्हापूरच्या जागेचा घोळ अजूनही कायम आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हापूरची जागा कोणाला मिळणार, हे सांगून टाकले आहे. या जागेचा निर्णय शाहू महाराज छत्रपती यांच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे.

जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati) हे कोल्हापूरमधून लोकसभा निवडणूक लढवायला इच्छूक नाहीत. शाहू महाराजांनी कोल्हापुरातून लोकसभेला उभं राहावं, अशी इच्छा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रथम व्यक्त केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पार्टी आणि काँग्रेसने शाहू महाराजांना लोकसभेला उभं राहावं, यासाठी गळ घातली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शाहू महाराज लोकसभेसाठी इच्छूक नाहीत. आम्ही त्यांना विनंती करतो आहोत की, तुम्ही कोल्हापुरातून लोकसभा निवडणुकीला उभं राहावं. त्यांनी कोल्हापुरातून लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, तर ते ज्या पक्षाकडून उभे राहतील, त्या पक्षाला कोल्हापूर लोकसभेची जागा द्यायची, असं आमच्या महाविकास आघाडीच्या चर्चेत ठरलं आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

जयंत पाटील म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ज्यावेळी कोल्हापुरात सभा झाली, त्यावेळी शाहू महाराज हे स्वतः त्या सभेला आले होते. त्यावेळी मीच त्यांना सांगितलं की, आपण कोल्हापुरातून लोकसभेला उभं राहिलं पाहिजे. त्यावेळी त्यांनी नाही म्हणून सांगितलं होतं. त्यानंतर आम्ही सर्वांनी त्यांना निवडणूक लढविण्याची गळ घातली.

मी कोल्हापुरातून लोकसभेची निवडणूक लढवावी, ही लोकांची इच्छा आहे, असे शाहू महाराज यांनी म्हटले आहे. आम्ही सर्वजण गळ घालतो, ती लोकांची इच्छा आहे. त्यांची लोकसभा निवडणूक लढविण्याची अगोदर इच्छा नव्हती, आम्ही त्यांना विनंती करतो आहे की, तुम्ही निवडणुकीला उभं राहावं, असेही जयंतरावांनी स्पष्ट केले.

‘आंबेडकरांच्या वक्तव्यावर जाहीर प्रतिक्रिया देणार नाही’

आम्ही त्यांच्या प्रत्येक बोलण्याला महत्व देऊन आदर करतो. आम्ही तुटलेला असूनही पक्ष आहोत, याला ते मान्यता देतात, हेच आमच्यासाठी मोठे आहे. या तुटलेल्या दोन्ही पक्षांशी म्हणजेच आमच्याशी आघाडी करताना ते आमच्याशी चर्चा करत आहेत. मी त्यांच्या वक्तव्यावर जाहीर वक्तव्य करणे हे परिपक्वपणाचे लक्षण नाही. बाळासाहेब आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यावर मी जाहीर प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही. वंचित आघाडीसह सर्वांची आघाडी व्हावी, असाच आमचा शेवटपर्यंत प्रयत्न राहील, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT