Varun Sardesai Vs Shrikant Shinde Sarkarnama
मुंबई

Varun Sardesai News : '...तर आता वडील मुख्यमंत्री असताना तुम्ही खासदारकी का लढवता?' ; वरुण सरदेसाईंचा श्रीकांत शिंदेंना सवाल!

Pankaj Rodekar

Loksabha Election News : 'उपमुख्यमंत्री फडणवीस हे शिंदे सेनेचे उमेदवारही जाहीर करतात आणि तेच जाहीर केलेल्या उमेदवाराचे तिकीटही कापतात. मग शिंदेंच्या शिवसेनेचे मुख्य नेते काय करतात. स्वतःला शिवसेना म्हणून घेणाऱ्यांचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असाच प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.' असं युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई म्हणाले आहेत.

तसेच 'मोठ्या मनापासून सांगत होते सामान्य शिवसैनिकाला पुढे आणणार. पुढे आणायचे होते तर आता वडील मुख्यमंत्री असताना तुम्ही खासदारकी का लढवता?, द्या सामान्य शिवसैनिकांना संधी का तुमच्या तेवढी दानत नाही.' अशा शब्दांमध्ये वरुण सरदेसाई यांनी शिंदे पितापुत्रांवर टीका केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वरुण सरदेसाई(Varun Sardesai) हे शनिवारी ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण या मतदारसंघातील उमेदवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर आले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील टीका केली आहे. पुढे बोलताना सरदेसाई यांनी भेटीदरम्यान झालेली चर्चा ही सकारात्मक झाल्याचे सांगितले. तसेच प्रचारात लीड घेतला असून दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तर, श्रीकांत शिंदे(Shrikant Shinde) यांच्या उमेदवारी बाबत विचारल्यावर त्यांनी हे सर्वात मोठे दुर्दैव आहे. हिंगोलीतील जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ती बदलायला लावली. आता कल्याणची जागा जाहीर झाली नाही आणि फडणवीस यांनी परस्पर उमेदवार जाहीर केला. त्यामुळे स्वतःला शिवसेना म्हणता त्यांचे नेते मुख्यमंत्री शिंदे आहेत की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. तसेच फडणवीस हेच जागा जाहीर करतात आणि तेच शिंदे यांच्या उमेदवाराची तिकीट कापतात. मग, शिंदे सेनेचे मुख्य नेते करतात काय? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

भाजप(Shivsena) हा युती असताना शिवसेनेकडे असलेल्या प्रत्येक मतदारसंघावर आता परस्पर दावा करत आहे. कल्याण असो ठाणे असो या नाशिक रत्नागिरी- सिंधुदुर्ग तसेच पालघर आणि मुंबईतील प्रत्येक मतदारसंघावर भाजप दावा करत असल्याचेही वरुण देसाईंनी यावेळी सांगितले. यावरून मुख्यमंत्री शिंदे यांचे काय उरले आहे, हेच दिसत असल्याचेही ते म्हणाले.

याशिवाय, श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना वरून सरदेसाई यांनी 2014 मध्ये श्रीकांत शिंदे हे स्वतः एक सामान्य माणूस होते ते विसरले असतील. 2014 मध्ये त्यांच्यासोबत वरुण सरदेसाई हेच फिरत होते. आजही वैशाली दरेकर यांच्यासोबत वरूण सरदेसाई फिरत आहे. कोणी किती काय केले हे विसरण्याची शिंदे यांना सवय हे पुन्हा एकदा दिसते. मोठ्या मनापासून सांगत होते, सामान्य शिवसैनिकाला पुढे आणणार. पुढे आणायचे होते तर आता तुमचे वडील मुख्यमंत्री आहेत मग सामान्य शिवसैनिकाला संधी द्यायची. तुमच्या दानत नाही ,पण ते केले पाहिजे. असाही टोला सरदेसाई यांनी यावेळी लगावला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT