rajendra pawar ajit pawar sarkarnama
पुणे

Rajendra Pawar News : "प्रत्येक वेळी मीच केले, असं 'ते' म्हणू शकत नाहीत"; राजेंद्र पवारांनी अजितदादांना फटकारलं

मिलिंद संगई :सरकारनामा

बारामतीत आम्ही अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्यापेक्षा जास्त राहतो. आम्ही सामाजिक काम करतो, ते राजकीय जीवनात कार्यरत आहेत. कुटुंबातील घटक म्हणून आम्ही हे स्वीकारलेले होतं. दादांनी राजकीय भूमिका पार पाडायची आणि आम्ही सामाजिक कामे करायचे हे ठरलेलं. याचा अर्थ प्रत्येक वेळेस मीच केले, मीच केले, असं ते म्हणू शकत नाहीत, अशा शब्दांत बारामती अॅग्रोचे अध्यक्ष, राजेंद्र पवार ( Rajendra Pawar ) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुनावलं आहे.

सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या ( Baramati Lok Sabha Constituency ) प्रचाराचा प्रारंभ शुक्रवारी ( 19 एप्रिल ) होणार आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी राजेंद्र पवार ( Rajendra Pawar ) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'नुसती भाषणे देऊन विकास होत नसतो,' अशी टीका अजित पवारांनी ( Ajit Pawar ) वारंवार खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केली आहे. याबाबत विचारलं असता राजेंद्र पवार म्हणाले, "जो विकास झाला जो निधी आला तो एकत्रित होता; त्यात शरद पवार व सुप्रिया सुळेंचाही निधी होताच. कदाचित राज्य सरकारमध्ये असल्याने अजित पवारांचा अधिकचा निधी आला असेल, हे मान्य आहे. पण, स्वयंपाक सगळ्यांनी मिळून केला होता, वाढप्याकडे वाढायचे काम दिलेले होते; वाढपी वाढतोय याचा अर्थ सगळा स्वयंपाक त्याने एकट्यानेच केलाय, असा कदाचित त्यांचा समज झाला असावा."

"बारामतीत आम्ही अजित पवार यांच्यापेक्षा जास्त राहतो. आम्ही सामाजिक काम करतो, ते राजकीय जीवनात कार्यरत आहेत. कुटुंबातील घटक म्हणून आम्ही हे स्वीकारलेले होतं. दादांनी राजकीय भूमिका पार पाडायची आणि आम्ही सामाजिक कामे करायचे हे ठरलेलं. याचा अर्थ प्रत्येक वेळेस मीच केले, मीच केले; असं ते म्हणू शकत नाहीत. योग्य वेळ येईल तेव्हा आम्हीही सगळ्या गोष्टींचा खुलासा करू," असं राजेंद्र पवारांनी म्हटलं.

"छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीपासून आम्ही प्रचार करतो. गेल्या निवडणुकीत रोहित पवार कर्जत-जामखेडमध्ये उभे होते, त्यामुळे आम्ही तिकडे जोर लावला होता. त्याअगोदरच्या निवडणुकीतही आम्ही गाव ते गाव, घर ते घर असा प्रचार केलेला आहे. एक दोन निवडणुकीत आम्ही नसलो, तर गेल्या 35 वर्षांतील निवडणुकीतच आम्ही नाही, असे ते म्हणणार असतील तर मग काय बोलायचं. त्यांच्यासारख्या राज्यस्तरीय नेत्याला मोरगावमध्ये तासभर लोकांशी का बोलाव लागतं, याचे उत्तर त्यांनीच द्यावे," असा टोलाही राजेंद्र पवारांनी अजित पवारांना लगावला.

( Edited By : Akshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT