Ajit Pawar,  Eknath Shinde, Amit Shah, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Eknath Shinde, Amit Shah, Devendra FadnavisSarkarnama

Amit Shah : '2029 ला महाराष्ट्रात एकट्या भाजपचं सरकार येणार'; अमित शाह नेमकं काय म्हणाले?

Amit Shah On Maharashtra Assembly Election 2024 : "जे सरकार काम करतं तेच निवडणुका जिंकतात, देशात आपण सलग तिसऱ्यांजा सरकार बनवलं आहे. आता निराशा झटकून टाका, कोणत्याही सर्व्हेचा विचार करू नका, महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार येईल."
Published on

Mumbai News, 01 Oct : आगामी विधानसभेची रणनीती ठरवण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी सूचना दिल्या आहेत.

यावेळी त्यांनी यंदा महायुतीचाच विजय होणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्याची महायुती 2029 असणार की नाही? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

कारण, "यंदा राज्यात महायुतीचं सरकार येईल, पण 2029 साली एकट्या भाजपच्या (BJP) जीवावर सत्ता आणायची आहे", असं वक्तव्य शाह यांनी केलं आहे. त्यामुळे आता नाही पण 2029 च्या निवडणुकीसाठी भाजपची 'एकला चलो'ची भूमिका असल्याचं दिसून येत आहे.

कार्यकर्त्यांना सूचना देताना अमित शाह म्हणाले, "जे सरकार काम करतं तेच निवडणुका जिंकतात, देशात आपण सलग तिसऱ्यांजा सरकार बनवलं आहे. आता निराशा झटकून टाका, कोणत्याही सर्व्हेचा विचार करू नका, महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार येईल." असा विश्वास व्यक्त करतच त्यांनी 2029 च्या विधानसभेत एकट्याच्या जीवावर सत्ता आणायची असल्याचं आवाहन केलं.

Ajit Pawar,  Eknath Shinde, Amit Shah, Devendra Fadnavis
Shahajibapu Patil : आमचा उठाव पाहून 'या' देशातील खासदारांनीही बंड केलं अन् पंतप्रधानाला हटवलं; शहाजीबापूंची फटकेबाजी

"यंदा राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार येईल, पण 2029 साली एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता आणायची आहे. तर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ असून महाराष्ट्रात सत्ता आल्यास समान नागरी कायदा आणण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही", असं शाह म्हणाले.

Ajit Pawar,  Eknath Shinde, Amit Shah, Devendra Fadnavis
Pune Vidhansabha Election 2024 : पुण्यात चार मतदारसंघात उमेदवार फिक्स; कसबा अन् कॅन्टोन्मेंटमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच

तर, मागील 60 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग तीन वेळा सरकार बनवण्याचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. महाराष्ट्राची निवडणूक देशाची दशा आणि दिशा बदलणारी असून ही निवडणूक महायुतीच जिंकेल कारण महायुतीला रोखण्याची ताकद कुठल्याही पक्षात नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस सक्षम

दरम्यान, महाराष्ट्रातील निवडणूक जिंकल्यानंतर समान नागरी कायदा लागू करणार असून राज्यातील प्रश्न सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. मी कार्यकर्त्यापासून राष्ट्रीय अध्यक्ष पदापर्यंत पोहोचलो. त्यामुळे मी जेव्हा कार्यकर्त्यांशी संवाद साधतो, तेव्हा मला खूप आनंद होतो, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com