PM Modi BMC Election : मुंबईत ठाकरे पराभूत, PM मोदी पहिल्यांदाच जाहीरपणे बोलले; सांगितलं भाजपच्या विजयामागचं कारण…

Thackeray defeat Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणुकांचे काल निकाल जाहीर झाले. त्यामध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय झाला आहे.
Uddhav Thackeray, Narendra Modi
Uddhav Thackeray, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

PM Narendra Modi statement : मुंबई महापालिकेत २५ वर्षासून सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा निवडणुकीत पराभव झाला. भाजपने ८९ जागा मिळवत पहिल्यांदाच सत्ता काबीज केली. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान होणार आहे. याचा जेवढा आनंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झाला आहे, त्याहून अधिक आनंद पंतप्रधान नरेंद्र मोदींना झालाय.

मुंबईसह महाराष्ट्रातील भाजपच्या विजयी कामगिरीचे त्यांनी शुक्रवारीच सोशल मीडियातून तोंडभरून कौतुक केले आहे. या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी जाहीर सभेतही मुंबईतील विजयाचा उल्लेख करत पाठ थोपटली आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे.

बंगालमध्येही भाजपला अद्याप एकदाही सत्ता मिळालेली नाही. मुंबईपाठोपाठ आता बंगालमध्येही भाजपचा सत्ता येईल, असा विश्वास पंतप्रधानांनी आज मालदा येथील जाहीर सभेत व्यक्त केला. नव्या वर्षातील त्यांची ही बंगालमधील पहिलीच सभा होती. या भाषणात त्यांनी महाराष्ट्र आणि मुंबईतील निवडणुकांमधील विजयाचा उल्लेख करत मतदारांना आवाहन केले.

Uddhav Thackeray, Narendra Modi
Cabinet Meeting update : दणक्यात विजय मिळवताच फडणवीसांचे 'कॅबिनेट'मध्ये महत्वाचे निर्णय; शिंदे, पवारांच्या अनुपस्थितीत मुंबईकरांना दिला मोठा दिलासा...

पंतप्रधान मोदी म्हणाले, महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणुकांचे काल निकाल जाहीर झाले. त्यामध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय झाला आहे. खासकरून महाराष्ट्राची राजधानी आणि जगातील सर्वात मोठ्या महापालिकांपैकी एक असलेल्या मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच भाजपला विक्रमी विजय मिळाला आहे. आधी भाजपच्या विजयाची शक्यता नसलेल्या ठिकाणीही भाजपला आता अभूतपूर्व समर्थन मिळत आहे.

देशातील मतदार, देशातील जेन झी हे भाजपच्या विकासाच्या मॉडेलवर किती विश्वास करतात, हे यातून स्पष्ट होते, असे सांगत पंतप्रधान मोदींनी मुंबईसह महाराष्ट्रातील विजयात जेन झीचा मोठा वाटा असल्याचे संकेत दिले. जिथे जिथे वर्षानुवर्षे भाजपविषयी खोटी माहिती पसरविण्यात आली, तेथील मतदार आता आशीर्वाद देत आहेत, असेही मोदी म्हणाले.

Uddhav Thackeray, Narendra Modi
BMC Election Result : निकालानंतर काँग्रेसमध्ये खळबळ; बड्या नेत्यानं घातला पहिला घाव, वर्षा गायकवाड राजीनामा देणार?

देशात विश्वास ठेवण्यायोग्य कोणता पक्ष असेल तर तो भाजप आहे. बिहारमध्ये एनडीएच्या विजयानंतर आता बंगालची वेळ आहे, असे सांगत मोदींनी बंगालमधील निवडणुकीचे रणशिंग फुंकले. राज्यात भाजपची सत्ता येतात घुसखोरांविरोधात मोठी कारवाई केली जाईल. तर शरणार्थींना सीएए च्या माध्यमातून सुरक्षा दिली जाईल, असेही पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com