
New Delhi News: पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष शुभंकर सरकार यांनी म्हटले आहे की, विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे नेतृत्व तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जींनी सांभाळल्यास प्रदेश काँग्रेसला काहीही अडचण नाही. यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचवाल्या आहेत, तर काँग्रेससाठी मात्र हा एक धक्काच मानला जात आहे.
कारण, मागील काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जींनी (Mamata Banerjee) म्हटले होते की, सध्या असणाऱ्या नेत्यांना विरोधी आघाडी व्यवस्थितपणे सांभाळता येत नाही. त्या बंगालमधूनच इंडिया आघाडीचे नेतृत्व करू शकतील.ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या.
विशेष म्हणजे काँग्रेसला जरी हे बोलणं खटकलेलं असलं तरीही इंडिया आघाडीमधीलच काही पक्षांनी ममता बॅनर्जींचे समर्थनही केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सर्वात आधी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटले की, ममता बॅनर्जी इंडिाय आघाडीचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत.
यापाठोपाठ राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनीही इंडिया आघाडीच्या नेतृत्वाच्या भूमिकेसाठी ममता बॅनर्जींचे समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले की, काँग्रेसच्या आक्षेपास काही अर्थ नाही.
तसेच तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी म्हटले की ममता बॅनर्जींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीला फायदाच होईल.काँग्रेसच्या (Congress) नेतृत्वात इंडिया आघाडीला संघर्षच करावा लागत आहे. या दरम्यान बुधवारी ममता बॅनर्जींनी त्या नेत्यांचे आभार व्यक्त केले, ज्यांनी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या नेतृत्वासाठी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.