Arvind Kejriwal : आंबेडकर वादात केजरीवालांचा नवा डाव; आता नितीश कुमार, चंद्राबाबू काय करणार?

Nitish Kumar on Ambedkar Remarks : संसदेच्या आवारात गुरूवारी काँग्रेस आणि भाजपच्या खासदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा आरोप होत आहे.
Arvind Kejriwal, Chandrababu Naidu, Nitish Kumar
Arvind Kejriwal, Chandrababu Naidu, Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीच्या विधानावरून गुरूवारी संसदेच्या आवारात जोरदार राडा झाला. तर दुसरीकडे ही संधी साधत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी नवा डाव टाकला आहे. केजरीवालांनी थेट बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना साद घातली आहे.

केजरीवालांनी गुरूवारी नितीशबाबू आणि चंद्राबाबूंना स्वतंत्रपणे पत्र लिहिले आहे. या पत्राला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. या पत्रात केजरीवालांनी आंबेडकरांवरून सुरू असलेल्या वादाचा उल्लेख करत दोन्ही नेत्यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. यामागचे कारण तितकेच महत्वाचे आहे. नितीशबाबूंचा संयुक्त जनता दल आणि चंद्राबाबूंचा तेलगू देसम या दोन पक्षांच्या टेकूवरच केंद्रातील भाजप सरकार स्थिर आहे.

Arvind Kejriwal, Chandrababu Naidu, Nitish Kumar
Dr Babasaheb Ambedkar Row : संसदेच्या आवारात घमासान; भाजप खासदार ICU मध्ये; केंद्रीय मंत्री रुग्णालयात पोहचले

लोकसभेत भाजपचे 240 खासदार आहेत. त्यामुळे या दोन्ही बाबूंची पुढील साडे चार वर्षे भाजपला साथ गरजेची आहे. हे महत्व लक्षात घेऊन केजरीवालांनी त्यांना पत्र लिहित सरकारचा पाठिंबा काढण्याबाबत सूचक विधान केले आहे. भाजपने संसदेत बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे. लोकांना वाटत आहे की, बाबासाहेबांचे चाहते भाजपचे समर्थन करू शकत नाहीत. तुम्ही यावर विचार करावा, असे केजरीवालांनी पत्रात म्हटले आहे.

केजरीलावांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र सावर्जनिक केले आहे. यामध्ये त्यांनी अमित शाह यांच्या विधानाचा उल्लेख करत त्यांनी बाबासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे देशभरातील कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यावर माफी मागण्याऐवजी त्यांनी ते योग्य ठरवले आहे. पंतप्रधानांनीही त्यांचे समर्थन केले, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Arvind Kejriwal, Chandrababu Naidu, Nitish Kumar
Major Decisions Impacting India 2025 : जनगणना, एक देश-एक निवडणूक... हे 5 मोठे निर्णय नवीन वर्षात देशाची दिशा ठरवणार?

काय घडलं संसद आवारात?

संसदेच्या आवारात गुरूवारी अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस आणि भाजपचे खासदार एकमेकांविरोधात उभे ठाकल्यानंतर धक्काबुक्की झाल्याचा आरोप दोन्ही बाजूने केला जात आहे. मात्र, या झटापटीत भाजपच्या एका खासदाराची प्रकृती बिघडल्याने त्यांना थेट अतिदक्षत विभागात दाखल करावे लागले आहे. भाजपचे खासदार मुकेश राजपूत यांना दिल्लीतील आयएमएल रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

याच रुग्णालयात भाजपचे दुसरे खासदार प्रताप सारंगी यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धक्का दिल्याने राजपूत हे सारंगी यांच्या अंगावर पडले. त्यानंतर सारंगी खाली पडून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. तर राजपूत यांनाही दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून राजपूत यांच्या प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com