Fadnavis on Rahul Gandhi: "राहुल गांधींच्या डोक्यातली चीप चोरीला गेलीए"; स्फोटक पत्रकार परिषदेनंतर CM फडणवीसांची घणाघाती टीका

Fadnavis on Rahul Gandhi: राहुल गांधींनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपल्या यंत्रणांमार्फत केलेल्या निवडणूक डेटाचा तपशील समोर मांडला आणि त्यातून देशात विविध निवडणुकांमध्ये घोटाळे झाल्याचा दावा केला.
Devendra Fadnavis, Rahul Gandhi
Devendra Fadnavis, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Fadnavis on Rahul Gandhi: लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी दुपारी पत्रकार परिषद घेत आपल्या यंत्रणांनी केलेल्या निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या पडताळणीचा डेटा जाहीर केला. यामध्ये भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेशात दुबार नावं असल्याचा दावा केला. तसंच अनेक मतदार यांद्यांमध्ये घोटाळा झाल्याचंही म्हटलं आहे. त्यांच्या या दाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना राहुल गांधींवर घणाघाती टीका केली.

Devendra Fadnavis, Rahul Gandhi
Rahul Gandhi: राहुल गांधींनी आकडेवारीचा बॉम्ब टाकताच निवडणूक आयोगानं दिलं चॅलेंज! कायद्यातील 'या' कलमानुसार, आजच संध्याकाळी...

मेंदूची चीप चोरीला

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, एकतर महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही मतांची चोरी झालेली नाही, मला तर असं वाटतं की राहुल गांधींच्या मेंदुची चीपच चोरीला गेली आहे. तसंच त्यांची हार्डडिस्क करप्ट झालेली आहे. त्यामुळं ते सातत्यानं खोटं बोलत आहेत, चुकीची विधान करत आहेत. तसंच जनमताची चोरी करत आहेत, लोकशाहीला चोरत आहेत. तसंच लोकशाही दिलेला निर्णय चोरी करत आहेत. त्यांची आकडेवारी देखील वारंवार बदलते, गेल्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, ७५ लाख मतदार वाढले आणि आता म्हणताहेत की, १ कोटी मतदार वाढले.

महाराष्ट्राच्या मतांच्या बाबतीत दरवेळी काहीतरी नवी सांगून ते सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना आता हे कळून चुकलेलं आहे की, पुढच्याही निवडणुकीत तसंच बिहारमध्ये आपल्याला निवडून येता येणार नाही. त्यामुळं ही कव्हर फायरिंग करुन ठेवायचं अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. माझा राहुल गांधींना एक प्रश्न आहे की, निवडणूक आयोगानं बिहारच्या इलेक्शनचं कॉम्प्रेहेन्सिव्ह रिव्हिजन सुरु केलं आहे तर त्याला तुमचा विरोध का आहे? मी २०१२ रोजी यासाठी पिटिशन केली होती.

Devendra Fadnavis, Rahul Gandhi
Karnataka EC: "अपात्र मतदारांची माहिती द्या, कार्यवाही करु"; स्फोटक पत्रकार परिषदेनंतर कर्नाटकच्या निवडणूक अधिकाऱ्यांचं राहुल गांधींना पत्र

भारतात अराजक तयार करण्याची मानसिकता

मतदार यादीत सुधारणा करण्यासाठी हे आवश्यक आहे. त्यामुळं एकीकडं याला विरोध करायचा आणि निवडणूक यादी सदोष आहे असं म्हणायचं. त्यामुळं एक प्रकारे आपल्या लोकशाहीनं तयार केलेल्या संस्थांवरुन लोकांचा विश्वास उडला पाहिजे, भारताच्या लोकशाही प्रक्रियांवरुन लोकांचा विश्वास उडला पाहिजे, भारतात अराजक तयार झालं पाहिजे अशी मानसिकता राहुल गांधींची दिसते आहे. कारण त्यांच्या पक्षाला पुढे भविष्य दिसत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर शब्दांत टीका केली.

Devendra Fadnavis, Rahul Gandhi
Rahul Gandhi: ओपिनियन, एक्झिट पोलचे अंदाज कसे चुकतात? निवडणूक आयोग टार्गेट; राहुल गांधींनी आकडेवारी सादर करत केली पोलखोल

राहुल गांधींचा दावा काय?

राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत आरोप केला होता की, महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर राज्यांतील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार झाले आहेत. यांमध्ये लाखो अशी नावं टाकण्यात आली आहेत जी अयोग्य आहेत. तर लाखो योग्य मतदारांची नावं या याद्यांमधून वगळण्यात आली आहेत. राहुल गांधींनी याला मतांची चोरी असं संबोधलं आहे. तसंच म्हटलं की, निवडणूक आयोगाची निष्पक्षता आणि विश्वसनीयतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे, असा आरोपही त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com