Amit Shaha News : भाजप सत्तेत आल्यास 'एक देश एक निवडणूक', तर 'या' कायद्याचीही अंमलबजावणी करणार; शहांचं आश्वासन

One country one election: अमित शहा यांनी एका मुलाखतीत बोलाताना मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर काय कामं करणार याची माहिती दिली. तसंच निवडणुकीसाठीचा उन्हाळ्याचा कालावधी बदलण्याबाबत विचार होऊ शकतो, असं ते म्हणाले.
Amit Shaha
Amit ShahaSarkarnama

Amit Shaha News: लोकसभेसाठीचं (Lok Sabha Election) देशभरातली अनेक मतदारसंघातील मतदान पार पडलं आहे. तर काही ठिकाणंचं मतदान अद्याप बाकी आहे. त्यामुळे उरलेल्या मतदारसंघातील मतदारांना आकर्षिक करण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध आश्वासन दिली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता भारतीय जनता पक्ष (BJP) सत्तेत आल्यास एक देश एक निवडणूक आणि देशभरात समान नागरी कायदा लागू करु असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांनी दिलं.

अमित शहा (Amit Shaha) यांनी एका मुलाखतीत बोलाताना विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. तसेच मोदी सरकार (Modi Govt) पुन्हा सत्तेत आल्यावर काय कामं करणार याचीही त्यांनी माहिती दिली. या मुलाखतीत त्यांना ऐन उन्हाळ्यात घेण्यात आलेल्या निवडणुकांबाबत प्रश्न विचारला असता शहा म्हणाले, "मागील अनेक वर्षांमध्ये निवडणुकीच्या काळात बदल होत आहे, आता उन्हाळ्यात निवडणुका घेतल्या मात्र, हा कालावधी बदलण्याबाबत विचार होऊ शकतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणूक उन्हाळा सुरु होण्यापूर्वी घेता येईल का? याची चाचपणी केली जाईल. तसेच उन्हाळ्याचा काळ हा विद्यार्थ्यांच्या सुट्यांचाही काळ असतो. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. शिवाय आता देशात निवडणुका एकाच वेळी घेण्याचीही वेळ आली आहे. निवडणुकांवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. म्हणूनच भाजप सत्तेत आल्यास 'एक देश, एक निवडणूक' पद्धतीची अंमलबजावणी करू." (One country one election)

तसंच समान नागरी कायदा (UCC) देशासाठी आवश्‍यक असल्याचंही शहा यावेळी म्हणाले. आपली संसद आणि राज्यांच्या विधानसभा यांच्यावर स्वातंत्र्यापासून सोपविण्यात आलेली ही मोठी जबाबदारी आहे. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये यूसीसीचा समावेश आहे. घटनानिर्मितीच्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar), के. एम. मुन्शी आणि राजेंद्रबाबू यांच्यासारख्या कायदेतज्ज्ञांनीही धर्मनिरपेक्ष देशात धर्मावर आधारित कायदे नकोत, असं मत व्यक्त केलं होतं.

त्यामुळे समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करणे, हे आमचं लक्ष्य असणार आहे. तसंच समान नागरी कायदा हा 1950 पासून भाजपच्या अजेंड्यावर आहे. म्हणूनच उत्तराखंडमध्ये पूर्ण बहुमतातील सरकार आल्यानंतर भाजपने तिथे हा कायदा लागू केल्याची आठवण शहांनी यावेळी करुन दिली.

Amit Shaha
Sanjay Raut News : "4 जूननंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं दिसेल", असं कोण म्हणालं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com