Narendra Modi: अदानी-अंबानीकडून राहुल गांधींनी पैसे घेतल्यामुळेच ते आता..., PM मोदींचा गंभीर आरोप

Lok Sabha Election 2024: मागील काळात राहुल गांधींनी मोदी सरकार हे केवळ उद्योगपतींच्या फायद्याचे निर्णय घेत असतं, त्यांची कर्ज माफ करत असतात, असे आरोप केले होते. शिवाय या वेळी त्यांनी सतत अदाणी-अंबानी यांच्या नावाचा उल्लेखदेखील केला होता.
Rahul Gandhi, Narendra Modi
Rahul Gandhi, Narendra ModiSarkarnama

PM Narendra Modi On Rahul Gandhi: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठीचा (Lok Sabha Election) प्रचार जोरदार सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. शिवाय या प्रचारादरम्यान विविध पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

अशातच आज बुधवारी (8 मे) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तेलंगणाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केले. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी उद्योगपती गौतम अदाणी आणि मुकेश अंबानी यांची नावे घेत नसून त्यांनी या उद्योगपतींकडून मोठ्या प्रमाणात काळा पैसा गोळा केला आहे. हा पैसा घेतल्यानंतरच काँग्रेसने त्यांच्यावर टीका करणं बंद केलं असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तेलंगणाच्या (Telangana) दौऱ्यावर असताना करीमनगर येथील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, गेली 5 वर्षे काँग्रेसचे राजपुत्र दिवसरात्र अदाणी आणि अंबानी यांचे नाव घेऊन त्यांच्यावर टीका करायचे. परंतु लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून त्यांनी अदाणी आणि अंबानींना शिव्या देणं बंद केले आहे. मला काँग्रेसच्या राजपुत्राला विचारायचे आहे की, त्यांनी या दोन्ही उद्योगपतींकडून पैशांची किती पोती भरून घेतली आहेत. काँग्रेसला (Congress) ट्रकभरून पोहोचले का, यांच्यात काय डील झाली? काँग्रेसला उद्योगपतींकडून निवडणुकीसाठी किती पैसे मिळाले?" असे प्रश्न मोदींनी या सभेत उपस्थित केले.

दरम्यान, मागील काळात राहुल गांधींनी (Rahul Gandhi) मोदी सरकार केवळ उद्योगपतींच्या फायद्याचे निर्णय घेत असतं, त्यांची कर्ज माफ करत असतं, असे आरोप केले होते. शिवाय या वेळी त्यांनी सतत अदाणी आणि अंबानी यांच्या नावाचा उल्लेखदेखील केला होता. मात्र आजपर्यंत मोदींनी यावर कधी भाष्य केलं नव्हंत. मात्र आजच्या सभेत त्यांनी राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देताना अदाणी-अंबानी यांचे नाव घेतल्याचं पाहायला मिळालं.

तर मोदींनी अदाणी-अंबानी यांचं नाव घेताच, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे. काळ बदलत आहे. आता मित्र मित्र राहिला नाही, निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतर आता पंतप्रधान आपल्याच मित्रांवर हल्लाबोल करत आहेत. मोदीजींची खुर्ची डळमळीत झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. हेच निवडणुकीच्या निकालांचे खरे परिणाम असल्याचं खर्गे यांनी म्हटलं.

Rahul Gandhi, Narendra Modi
Sharad Pawar: शरद पवारांच्या मुत्सद्देगिरीचं 'परफेक्ट टायमिंग; ऐन निवडणुकीत भाजपवर टाकला मोठा बॉम्ब

तर मोदींच्या वक्तव्यावर प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या, "राहुल गांधी अदाणी-अंबानी यांचे नाव घेत नसले तरी ते रोज उद्योगपतींबद्दल बोलतात. त्यांचे सत्य लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतात. भाजप आणि मोठ्या उद्योगपतींचे साटेलोटे आम्ही उजेडात आणतोय. पंतप्रधानांनी आपल्या मित्रांचे 16 लाख कोटींचे कर्ज माफ केले. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आत्महत्या करत असूनही त्यांची कर्जमाफी केली जात नाही."

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com