Narendra Modi News : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडला. मध्यमवर्गाला मोठा दिलासा देत तब्बल 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री करण्यात आले आहे. अर्थसंकल्पातील याच निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला टार्गेट केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत मोदी म्हणाले की, 'तुम्ही नेहरूंच्या काळात 12 लाख रुपये कमावले असते तर सरकारने तुमच्या पगाराचा एक चतुर्थांश भाग परत घेतला असता.'
मोदी यांनी इंदिरा गांधींच्या सरकारेच उदाहरण देत सांगितले की, इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये जर तुम्ही 12 लाख रुपये कमावले तर तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंत टॅक्स भरावे लागायचे. मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान काळावर देखील भाष्य करत म्हटले की, 10-12 वर्षांपूर्वीपर्यंत काँग्रेस सरकारच्या काळात जर तुम्ही 12 लाख रुपये कमावले तर तुम्हाला दोन लाख 60 हजार रुपये कर भरावा लागत होता.
मोदी म्हणाले,'एकीकडे संकटाच्या खोट्या घोषणा आहेत, तर दुसरीकडे तुमचा सेवक मोदी आहेत. मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण करण्याची गॅरंटी आहे. 'काल जे अर्थसंकल्प सादर झाला ती सुद्धा मोदींची गॅरंटी आहे.
अर्थसंकल्पावर विरोधी पक्षांकडून टीका करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले की, गोळी लागल्या जखमेवर की केवळ वरवरची मलमपट्टी आहे. भारतामध्ये आर्थिक संकट असताना, जगामध्ये आर्थिक परिस्थिती चांगली नसताना मोठी सुधारणा करण्याची संधी होती. मात्र, ही संधी गमावण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.