

New Delhi News: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्याच दिवशी तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बुधवारी (ता. 22 जुलै) मोठी कारवाई केली आहे. त्यांनी तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचं पूर्ण अधिवेशनासाठी निलंबन केलं आहे.
लोकसभा अध्यक्षांनी तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर सभागृहात असंसदीय भाषा वापरल्याचा ठपका ठेवत संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित केलं आहे. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार कल्याण बॅनर्जी यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. असंसदीय भाषा वापरल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आले.
तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार कल्याण बॅनर्जी यांनी अधिवेशन दरम्यान सभागृहामध्येच कथितरित्या एका बंडखोर टीएमसी खासदाराला 'चोर' असं संबोधल्याचं समोर येत आहे. यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही कारवाई केली आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सलग तिसऱ्या दिवशीही विरोधी पक्षांनी गदारोळ कायम ठेवल्याचं दिसून आलं. या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नीट पेपर फुटी, सरन्यायाधीश वक्तव्याविरोधातील आंदोलनावरचा लाठीचार्ज आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर चर्चा करण्याचा आग्रह धरला.
तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचा मिताली बेग, शताब्दी रॉय आणि काकोली घोष दस्तीदार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर खासदारांशी वाद झाला. हे तिघेही पूर्वी तृणमूल काँग्रेसशी संबंधित होते, परंतु नंतर त्यांनी पक्ष सोडून प्रवेश केला.
या वादानंतर संतापलेल्या खासदार मिताली बेग, काकोली घोष दस्तीदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन कल्याण मुखर्जी यांचा असंसदीय भाषेच्या वादा मुद्दा उपस्थित केला होता.
खासदार कल्याण बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसचा आक्रमक चेहरा असून पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर ते या खासदारांशी वाद घालताना दिसून आले. या वादाला नेमके काय कारण होते, हे अद्याप समोर आलेले नाही.
अनेक विरोधी खासदारांनी हस्तक्षेप करून परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न केला. काही सदस्यांनी कल्याण बॅनर्जी यांना काय झाले असे विचारल्यावर, ते लोकसभेच्या सभागृहातून निघून गेल्याचं पाहायला मिळालं. याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्यानं माहिती दिली आहे.
लोकसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांना या घटनेसंदर्भात लेखी तक्रार सादर करण्यास सांगितलं असल्याची माहिती समोर येत आहे. कल्याण बॅनर्जी यांच्यावर कारवाई करताना ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेसमधील फुटीच्या पार्श्वभूमीवर हा वाद निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्षाच्या पराभवानंतर, सुमारे 20 खासदारांनी ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्वाविरुद्ध बंड करून नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (एनसीपी) मध्ये प्रवेश केला आहे. तसेच या सर्व बंडखोर खासदारांना लोकसभेत तृणमूल काँग्रेसच्या खासदारांपासून वेगळे बसण्यासही लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली आहे. या गटानं सत्ताधारी एनडीए सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला पाठिंबा जाहीर केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.