Prashant Kishor: चार जूनला पाणी सोबत ठेवा; प्रशांत किशोरांचे टीकाकारांना उत्तर; भाजपच्या मतांची टक्केवारी...

BJP Politics: मी केलेल्या दाव्यावर ज्यांना आश्चर्य वाटते, त्यांनी चार जून रोजी आपल्या जवळ भरपूर पाणी ठेवावे. अनेकांना वाटते की भाजपला 370 जागा मिळेल, पण बहुमताचा आकडा 272बाबत कुणीही बोलत नाही.
Prashant Kishor
Prashant KishorSarkarnama

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची भाजपची तयारी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीचे अजून दोन टप्प्यातील मतदान बाकी आहे. भाजपकडून (Bjp) '400 पार'चा नारा दिला आहे. भाजपला 300 च्या आसपास जागा मिळतील, असा दावा राजकीय रणनितीकार आणि जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर (Prashant Kishor)यांनी केला आहे

प्रशांत किशोर यांनी केलेल्या दाव्यामुळे समाजमाध्यमांवर चर्चा रंगल्या आहेत. त्यांच्या दाव्यावर काही जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याला प्रशांत किशोर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना प्रशांत किशोर यांनी विरोधकांना निकालाच्या दिवशी चार जून रोजी सोबत पाणी ठेवा, असा अजब सल्ला दिला आहे. त्यांचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

Prashant Kishor
CM Eknath Shinde: आता आठवण कशी आली? तहानलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

शरीर आणि मन शांत राहण्यासाठी पाणी पिणे चांगले आहे. मी केलेल्या दाव्यावर ज्यांना आश्चर्य वाटते, त्यांनी चार जून रोजी आपल्या जवळ भरपूर पाणी ठेवावे. अनेकांना वाटते की भाजपला 370 जागा मिळेल, पण बहुमताचा आकडा 272बाबत कुणीही बोलत नाही.

पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये भाजपला असलेल्या जागांपेक्षा १५ ते २० जागा अधिक मिळतील. या राज्यांमध्ये भाजपच्या मतांची टक्केवारीही वाढणार आहे. त्यांच्या जागा कमी होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देशात मोदीच्या विरोधात असलेली लाट पाहायला मिळाली नाही, मोदी पुन्हा सत्तेत येईल. मोदींच्या नावावर भाजप पुन्हा सरकार स्थापन करणार, असे प्रशांत किशोर यांनी ठामपणे म्हटले आहे. 'चारशे पार', ही घोषणा भाजपची राजकीय डाव आहे. विरोधकांना ही घोषणा समजेलेली नाही. विरोधक गोंधळून गेले आहेत, असे ते म्हणाले.

काय म्हणाले होते प्रशांत किशोर

"ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपला 370 जागा मिळतील आणि 'एनएडीए' 400 पार जाईल, असा दावा केला होता. तेव्हाच मी म्हटलेलं, हे शक्य नाही. हे फक्त कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी घोषणाबाजी केली आहे. भाजपला 370 चा आकडा गाठणं शक्य नाही. मात्र, ते 270 च्या खाली सुद्धा येणार नाहीत."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com