Smriti Irani Challenge To Rahul Gandhi : लोकसभेत पुन्हा खासदार म्हणून आले अन् स्मृती इराणींनी केला राहुल गांधींचा पाणउतारा

No Confidence Motion : "तुमच्यात हिम्मत असेल तर तुमच्या सहकाऱ्याला चोख प्रत्युत्तर द्या"
Smriti Irani, Rahul Gandhi
Smriti Irani, Rahul GandhiSarkarnama

Rahul Gandhi In Parliament : लोकसभा निवडणुकीत (२०१९) काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना धुळ चारलेल्या भाजप नेत्या, केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी पुन्हा खासदारकी मिळालेले अन् सभागृहात दुसऱ्या दिवशी आलेल्या राहुल गांधींचा पाणउतारा केला. राहुल गांधींच्या विधानाचा चांगलाच समाचार इराणी यांनी घेतला. "राहुल गांधी म्हणजे भारत नाही," असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र डागलं.

"देशाच्या इतिहासात पहिल्यादांच भारतमातेच्या हत्येची चर्चा झाली. त्यावेळी काँग्रेसचे खासदार या ठिकाणी बाके वाजवित होते. टाळ्या वाजवत होते. तुम्ही म्हणजे हिंदुस्थान नाही, भारत मेरिटवर विश्वास ठेवतो, घराणेशाहीवर नाही," असे इराणी म्हणाल्या.

Smriti Irani, Rahul Gandhi
Rahul Gandhi In Parliament : राहुल गांधींनी सांगितला रामायणातील 'तो' किस्सा ; मोदी फक्त 'या' दोघांचेच ऐकतात..

"आज येथे एक भारतीय असल्याने मी म्हणते की मणिपूरचे तुकडे झालेले नाहीत, मणिपूर विभागलेला नाही, तो माझ्या देशाचा एक भाग आहे. मी त्यांना विचारते, त्यांच्या आघाडीचा एक सदस्य इथे बसला आहे, जो तामिळनाडूत म्हणतो की भारत म्हणजे फक्त उत्तर भारत. भारत फक्त उत्तर भारत आहे का, तुमच्यात हिम्मत असेल तर तुमच्या सहकाऱ्याला चोख प्रत्युत्तर द्या," असे आवाहन इराणी यांनी राहुल गांधींना केले.

"काँग्रेसचा इतिहास हा रक्तानं माखलेला आहे," असं म्हणत इराणी आक्रमक झाल्या. अदानींवरून मोदी सरकारला काँग्रेसचे नेते वारंवार प्रश्न विचारत असतात. त्याला त्यांनी प्रत्युत्तर दिले. काँग्रेसनं अदानींना दिलेल्या कंत्राटांची, कर्जाची यादीच त्यांनी सभागृहात वाचून दाखवली.

"मणिपूरमध्ये मोदी सरकारने भारत मातेची हत्या केली,' असे विधान राहुल गांधींनी अधिवेशनात केलं. त्यानंतर सभागृहात गोंधळ उडाला. मोदी सरकारवर त्यांनी गंभीर आरोप केले. 'तुम्ही भारतमातेचे हत्यारे आहात,'असे ते म्हणाले.

Smriti Irani, Rahul Gandhi
Monsoon Session : पुन्हा खासदारकी बहाल झाल्यानंतर राहुल गांधींनी मानले अध्यक्षांचे आभार ; घाबरु नका, आज मी अदानींवर बोलणार नाही..

राहुल गांधी यांनी यावेळी रावण, कुंभकर्ण यांचा संदर्भ देत मोदी सरकारवर टीका केली. लंकेला रावणाच्या अहंकाराने जाळले, रावण दोनच लोकांचे ऐकत होता. त्याप्रमाणेच मोदी हे फक्त अमित शाह आणि अदानी यांचेचे ऐकतात," या विधानानंतर सभागृहात राजकीय 'रामायण' पाहायला मिळाले. सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आले.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com