Delhi Liquor Scam Case : ‘आप’ला मोठा दिलासा; मोदी सरकारला भिडणाऱ्या नेत्याची तुरुंगातून होणार सुटका

MP Sanjay Singh News : संजय सिंह यांना ईडीने सहा महिन्यांपूर्वी अटक केले होते. आज त्यांच्या जामिनाला ईडीने विरोध केला नाही हे विशेष.
Arvind kejriwal, Sanjay Singh
Arvind kejriwal, Sanjay Singh Sarkarnama

New Delhi News : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी (Delhi Liquor Scam Case) मागील काही महिन्यांत आम आदमी पक्षाला मोठे धक्के बसले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, खासदार संजय सिंह यांना ईडीने तुरुंगात टाकले. मात्र, आज अनेक दिवसांनंतर ‘आप’ला मोठा दिलासा मिळाला आहे. मोदी सरकारवर सतत तोफ डागणारे संजय सिंह तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने आज त्यांना जामीन मंजूर केला आहे.

लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरू असताना संजय सिंह (Sanjay Singh) यांचे बाहेर येणे, ‘आप’साठी सुखावणारे आहे. सिंह यांना मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात ईडीने (ED) अटक केली होती. दिल्ली हायकोर्टाने फेब्रुवारी महिन्यात त्यांना जामीन नाकारला होता. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली होती. अखेर आज कोर्टाने त्यांना काही अटी व शर्तींच्याआधारे जामीन मंजूर केला.

Arvind kejriwal, Sanjay Singh
Lok Sabha Election 2024 : भाजपनं मनेका गांधींना टाकलं अडचणीत! मतदारसंघाचा इतिहास पाहूनच बसेल धक्का...

अरविंद केजरीवाल (Delhi Liquor scam Case) यांना दोन दिवसांपूर्वीच तिहार जेलमध्ये नेण्यात आले आहे. याच तुरुंगात संजय सिंह यांच्यासह सिसोदिया आणि बीआरएसच्या नेत्या के. कविता हे तिघेही आहेत. आता केजरीवाल जेलमध्ये जाताच सिंह यांना दिलासा मिळाला. ईडीने त्यांच्या जामिनाला विरोध केला नसल्याचे समोर आले आहे. त्यांना राजकारणात सक्रिय होता येणार असल्याचेही कोर्टाने म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संजय सिंह यांनी जेलमधूनच राज्यसभेची निवडणूक लढवली होती. ही निवडणूक बिनविरोध पार पडल्याने ते दुसऱ्यांदा खासदार झाले. संसदेसह बाहेरही संजय सिंह यांच्याकडून सातत्याने भाजप व मोदी सरकारवर जोरदार टीका केली जाते. ‘आप’ची धडाडणारी तोफ म्हणून त्यांची ओळख आहे. आता लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झालेला असताना ते बाहेर आल्याने पक्षातील नेत्यांचे मनोबल वाढणार आहे.

चार नेत्यांना अटक होणार

आज सकाळीच आपच्या नेत्या दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. आपल्यासह चार नेत्यांना अटक करण्याचा भाजपचा डाव असल्याचे म्हटले आहे. आतिशी, सौरभ भारद्वाज, राघव चड्ढा आणि दुर्गेश पाठक यांचा या नेत्यांमध्ये समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळातच अटक होईल, असा दावाही त्यांनी केला.

R

Arvind kejriwal, Sanjay Singh
Lok Sabha Election 2024 : बिहारमध्ये भाजपला धक्का; विद्यमान खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com