Union Budget 2024 : युवकांसाठी ‘पंतप्रधान पॅकेज’; शिक्षण, कौशल्य अन् रोजगारासाठी मोठ्या घोषणा...

Nirmala Sitharaman Modi Government : निर्मला सीतारमण यांच्याकडून संसदेत अर्थसंकल्प सादर केला जात असून त्यांच्याकडून सुरूवातीलाच युवकांवर अधिक भर देण्यात आला.
Budget 2024
Budget 2024Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi : मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी युवकांसाठी पंतप्रधान पॅकेजची घोषणा केली. त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, रोजगार आणि कौशल्यावर भर देण्यात आला आहे. नव्या नोकरदारांनाही सीतारणण यांनी गुड न्यूज दिली आहे.

अंतरिम अर्थसंकल्पात गरीब, महिला, युवक आणि शेतकरी हे चार मुख्य आधार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. या सर्व घटकांच्या विकासासाठी सरकार कटिबध्द असल्याचे सीतारमण यांनी सांगितले. युवकांच्या रोजगाराला प्राधान्य दिले जाणार असून रोजगार आणि कौशल्य विकासासाठी पाच योजनांसाठी पंतप्रधान पॅकेज दिले जाणार आहे.

Budget 2024
FM Nirmala Sitharaman Union Budget 2024-25 Speech LIVE in Marathi : अर्थसंकल्पातील घोषणा म्हणजे वाऱ्यावरची वरात; जयंत पाटलांची टीका

युवकांसाठी शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासासाठी पाच वर्षांसाठीसाठी २ लाख कोटी रुपये दिले जाणार आहे. यावर्षी 1.48 लाख कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. याचा फायदा 4.1 कोटी युवकांना होईल.  ईपीएफओमध्ये पहिल्यांदा नोंदणी केलेल्या नव्या नोकरदारांना पहिल्या महिन्याचा पगार सरकार देणार असून त्यातून 1 कोटी 10 लाख युवकांना फायदा मिळणार आहे. त्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत, असे सीतारमण यांनी जाहीर केले.

रोजगारनिर्मितीसाठी दोन लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 30 लाख यवकांच्या रोजगारासाठी सरकारने योजना घोषित केली आहे. 20 लाख युवकांना पुढील पाच वर्षात कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. 1 हजार ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अद्ययावत केल्या जाणार आहेत. देशातील शिक्षणसंस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी दहा लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज दिले जाणार असल्याचे सीतारमण यांनी घोषित केले. शैक्षणिक कर्जासाटी तीन टक्क्यांच्या व्याजासाठी ई व्हाउचर दिले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Budget 2024
Union Budget 2024 : निर्मला सीतारमण कुणाला कोणतं गिफ्ट देणार? या आहेत अपेक्षा...

अर्थसंकल्पात आणखी काय?

महागाई दर स्थिर आणि नियंत्रणात आहे. हा दर चार टक्क्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न आहे. देशातील गरिबी करणे हे ध्येय आहे. गरीब कल्याण योजनेला पाच वर्षांची मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. कृषी उत्पादन वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. जैविक शेतीला प्राधान्य दिले जाईल.

शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारले जाणार असल्याची घोषणा सीतारमण यांनी केली. सहा कोटी शेतकऱ्यांचे रेकॉर्ड डिजिटल केले जाईल. कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. यावर्षी कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांच तरतूद करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com