Varun Gandhi News : लोकसभेवेळी गायब झालेले वरूण गांधी तब्बल 400 दिवसांनंतर सक्रीय; पंतप्रधान मोदींविषयी म्हणाले...

India vs Pakistan War : भारत आणि पाकिस्तानमध्ये युध्दजन्य स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानकडून सातत्याने सीमाभागात हल्ले केले जात आहेत.
Narendra Modi, Varun Gandhi
Narendra Modi, Varun GandhiSarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारल्याने माजी खासदार वरुण गांधी पक्षावर प्रचंड नाराज झाले होते. या निवडणुकीत त्यांच्या आई मनेका गांधी याही पराभूत झाल्या. पण त्याआधीपासूनच वरूण गांधी सोशल मीडियातून गायब झाले होते. आता ते सुमारे 400 दिवसांनी पुन्हा सक्रीय झाले असून पहिल्याच पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तोंडभरून कौतुक केले आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये युध्दजन्य स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानकडून सातत्याने सीमाभागात हल्ले केले जात आहेत. भारताकडून त्याला चोख प्रत्युत्तर दिले जात असून सर्व हल्ले परतवून लावले जात आहेत. यावेळी संपूर्ण देश भारतीय सैन्यदलाचे मनोधैर्य उंचावताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर वरुण गांधी यांनीही सोशल मीडियात एक पोस्ट केली आहे.

Narendra Modi, Varun Gandhi
India–Pakistan War Live : पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक संपली

वरुण गांधी यांनी आपल्या एक्स हँडलवर मागील वर्षी 28 मार्चला शेवटची पोस्ट केली होती. त्यानंतर त्यांनी आज (ता. 9 मे) पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, या आव्हानात्मक स्थितीत देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या सेनेसोबत उभे राहायला हवे. हे केवळ युध्द नाही तर दोन विचारधारांमधील संघर्ष असून संपूर्ण जग त्याचे साक्षीदार आहे.

एकीकडे मानवता, शांती आणि लोकशाहीला मानणारा भारत आहे तर दुसरीकडे कट्टरता, अस्थिरता आणि दहशतीचे प्रतिक बनलेला पाकिस्तान. स्थिर आणि सशक्त नेतृत्वासोबत भारत दहशतवादाविरोधात लढाई लढत आहे. आपले सैन्य राष्ट्रभक्ती, शिस्त आणि सेवाभावाने प्रेरित आहे तर त्यांची सेना घृणा, भ्रम आणि छळाने.

Narendra Modi, Varun Gandhi
Viral Video : पाकिस्तानच्या संसदेत मोदींचं नाव; खासदारानं पंतप्रधान शरीफ यांची अब्रू टांगली वेशीवर, Video व्हायरल

आज संपूर्ण देश एकजुटीने वीर सैनिकांचे बलिदान आणि पराक्रमाला सलाम करत आहे. आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाच्या सशक्त नेतृत्वावर गर्व आहे. भारत मानवता आणि न्यायाच्या रक्षणासाठी कधीही मागे हटणार नाही, हे त्यांनी जगाला दाखवून दिल्याचे वरूण गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. जगाला आता कळाले आहे की, नवा भारत निर्णय घ्यायला घाबरत नाही. प्रत्येक नागरिकाची सुरक्षा त्याच्यासाठी सर्वोच्च असल्याचेही वरुण यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com