
Bharat Controversy: लोकसभा २०२४ च्या निवडणुकीपूर्वी भारत या शब्दावरुन सत्ताधारी भाजपकडून वेगळीच मोहिम हाती घेण्यात आली होती. देशाचं इंडिया हे नाव बदलून भारत करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यानुसार, जी २० या भारतात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत इंडिया ऐवजी भारत शब्दाला महत्व देण्यात आलं होतं.
यामागे मोठं कारण होतं ते म्हणजे काँग्रेसप्रणित विरोधकांच्या महाआघाडीनं नामकरण 'इंडिया आघाडी' करण्यात आलं होतं. त्यामुळं भाजपकडून इंडिया या शब्दाला विरोध केला जात होता. हाच मुद्दा नुकताच आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी मांडला. त्यावरुन उलट-सुलट चर्चा सुरु असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर अगदी स्पष्ट शब्दांत भाष्य केलं आहे.
मोहन भागवत म्हणाले होते की, भारत ही एक व्यक्तीवाचक संज्ञा आहे. याचा अनुवाद केला जाता कामा नये. संविधानात लिहिलेलं 'India that is Bharat' हे ठीक आहे. पण भारत हा भारच आहे. त्यामुळं आपण जेव्हा लिहितो-बोलतो तेव्हा भारताला भारतच म्हटलं पाहिजे. भारताची ओळख, त्याचा सन्मान यासाठी होतो कारण तो भारत आहे. जर तुम्ही तुमची ओळख गमावली तर तुमच्याजवळ कितीही योग्यता असली तरी तुम्हाला या जगात सन्मान मिळणार नाही, सुरक्षाही मिळणार नाही.
भारत भारतच आहे, पण आपल्या संविधानात आपण भारत आणि इंडिया अशा दोन्ही संज्ञा वापरतो पण जर आपण भारत म्हणू तर जास्त चांगलं राहील. मला वाटतं आपण हा प्रयत्न करायला हवा की भारताला भारतच म्हणूयात. जगात असे अनेक देश आहेत ज्यांचं जुनं नवा आणि इतिहासानं दिलेलं नाव आहे. त्यामुळं मला वाटतं की मोहन भागवत यांनी चुकीची काहीही दिलेली नाही किंवा त्याच्यावर वाद होण्चाचं कारणंही नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.