
Jan Suraksha Act: जनसुरक्षा कायदा विधीमंडळात मंजूर झाला असून लवकरच त्याचं कायद्यात रुपांतर होणार आहे. पण राज्यातील अजूनही या कायद्याला जोरदार विरोध केला जात आहे. यावरुन आता मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टार्गेट केलं आहे. या कायद्याला विरोध करणारे संविधानविरोधी आहेत, असं म्हणत त्यांनी या कायद्यावर थेट ओपन डिबेटचं आव्हान त्यांनी दिलं आहे. वर्ध्यात भाजपच्या मंथन शिबिरात ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, "या कायद्याच्या माध्यमातून भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलं, त्या संविधानाला नाकारुन जे आराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना जेरबंद करण्याकरता आणि त्यांच्या कारवाया बंद करण्याकरता हा कायदा आपण केला आहे. जे लोक या कायद्याला विरोध करत आहेत त्यांचा भारताच्या संविधानाला विरोध आहे. तसंच भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या व्यवस्थेला विरोध आहे. त्यामुळं ओपन डिबेटला आम्ही तयार आहोत, पण त्यांची हिंमत नाही. त्यांना माहिती आहे की आपण इलॉजिकल बोलतो आहोत. या कायद्यात जे नाही ते बोलत आहेत. माझा दावा आहे या कायद्यावर जे लोक बोलत आहेत त्यातील ९९ टक्के लोकांनी हा कायदाच वाचलेला नाही"
दरम्यान, लोकसभेला विदर्भात झालेल्या भाजपच्या पराभवावर बोलताना फडणवीस म्हणाले, आपण अतिशय कमी मतांनी हारलो अन्यथा एक नवीन रेकॉर्ड आपण विदर्भात करु शकलो असतो. एकूणच महाराष्ट्रात सगळे रेकॉर्ड या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आपण तोडले. यापूर्वी आपला सर्वाधिक स्कोअर होतो तो २०२४ च्या निवडणुकीत होता. यावेळी शिवसेनेसोबत युती न करता १२२ जागा आपण जिंकलो होतो. यंदा भाजपच्या कार्यकर्त्यांनी कमाल केली आणि आपण १३२ आणि ५ अशा १३७ जागा भाजपनं जिंकल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.