Mahayuti Dispute : खेडमध्ये युतीचा निर्णय सामंत, कदमांच्या अंगलट, भाजपच्या माजी आमदार, जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा

BJP Leaders Accuse MLA Yogesh Kadam Over Khed : कोकणात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या जागा वाटपावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला असून शिवसेना नेते पालकमंत्री उदय सामंत आणि मंत्री योगेश कदम यांनी घेतलेल्या निर्णयाचा बूमरँग झाला आहे.
Khed Municipal Elections; Ajit Pawar, Eknath Shinde, Uday Samant And Yogesh Kadam
Khed Municipal Elections; Ajit Pawar, Eknath Shinde, Uday Samant And Yogesh Kadamsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. खेड नगरपरिषदेच्या जागावाटपावरून भाजप नेते आणि शिवसेना आमदार योगेश कदम यांच्यात वाद निर्माण झाला आहे.

  2. भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.

  3. भाजप पदाधिकाऱ्यांनी जागा वाटपात न्याय न झाल्यास राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.

Ratnagiri News : कोकणात आणि तळकोकणात महायुतीत वाद भडकला असून येथे नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या जागा वाटपावरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीत संबंध ताणले आहेत. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना-भाजप , रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी असा वाद असून रत्नागिरीत आता महायुतीतच वाद उफाळला आहे.

रत्नागिरीत तर नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेनं वेगळीच खेळी खेळत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दूर ठेवले होते. महायुतीच्या बैठकींना राष्ट्रवादीला बोलावण्यातच आले नव्हते. यावरून राष्ट्रवादीचे स्थानिक नेते, पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांमध्ये रोष होता. अशातच आता भाजप-शिवसेनेशी युती झाल्याचे समोर आले होते. तसेच मोठ्या शक्तिप्रदर्शनात शिवसेनेनं माधवी बुटाला याचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे महायुतीतच खदखद असल्याची चर्चा सुरू झाली होती.

या गोष्टीला अद्याप 24 तासही होत नाही तोच जिल्ह्यातील खेड नगर परिषदेत सन्मानजनक जागा वाटप न झाल्याच्या कारणास्तव भाजपच्या माजी आमदारासह जिल्हाध्यक्ष एकूण 39 पदाधिकाऱ्यांचा थेट राजीनाम्याचा इशारा दिला आहे. खेड नगरपरिषदेत एकूण 20 जागा असताना जागा वाटपामध्ये 17 जागा शिवसेना तर तीन जागा भाजपला देवून भाजपच्या तोंडाला पाने पुसण्यात आल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे.

Khed Municipal Elections; Ajit Pawar, Eknath Shinde, Uday Samant And Yogesh Kadam
Mahayuti internal dispute : निवडणुकांपूर्वीच ठाणे-नवी मुंबईसह 'या' 18 ठिकाणी महायुतीत धुसफूस; जागावाटपावरून 'सत्तेचे वाटेकरी' एकमेकांना भिडणार!

खेड नगरपरिषद स्वबळावर जिंकण्याची शक्यता असताना केवळ तीनच जागा मिळणे अत्यंत चुकीचे असल्याची नाराजी व्यक्त करताना जागा वाटपात शिवसेना आमदार योगेश कदम यांनी भाजपवर अन्याय केल्याचा आरोप माजी आमदार सुर्यकांत दळवी यांच्यासह जिल्ह्याध्यक्ष केदार साठे यांनी केला आहे. त्यांनी याबाबच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आणि नितेश राणे यांना पत्र लिहले आहे. तसेच या पत्रामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचेही म्हटलं आहे.

या पत्रात पदाधिकाऱ्यांनी, मंत्री योगेश कदम हे मीडिया समोर येऊन माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि वैभव खेडेकर यांच्या विरोधात अपमान जनक बोलत असल्याचा पत्रात आरोप करण्यात आला आहे. तसेच खेड नगरपरिषदेत ज्या पद्धतीने जागा वाटप झाले आहे. त्यामुळे पक्षाचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता असल्याचा थेट इशाराही यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठांना दिला आहे.

तसेच केंद्रात व राज्यात सत्ता तुमची आणि भांडी घासा आमची अशा पद्धतीने देखील शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी गावागावात जाऊन हिणवत असल्याची कैफियतही भाजपच्या कार्यकर्त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे. तर खेड नगर परिषदेचे जागावाटपात भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याची भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

तर योगेश कदम यांनी मीडिया समोर बोलणे तातडीने थांबवावे, जागावाटपात न्याय आणि सन्मानजनक निर्णय व्हावा अशी मागणी या पत्रातून पदाधिकाऱ्यांनी केली आहे. आता या पत्रावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आणि नितेश राणे कोणता निर्णय घेतात, उदय सामंत, योगेश कदम काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागणार आहे.

Khed Municipal Elections; Ajit Pawar, Eknath Shinde, Uday Samant And Yogesh Kadam
Mahayuti Dispute : शिवेंद्रराजेंचा शंभूराज देसाईंवर पलटवार; जो निर्णय पाटणमध्ये होईल, तोच मेढ्यात होईल

FAQs :

1. खेड नगरपरिषदेत वाद का निर्माण झाला आहे?
→ जागावाटपात भाजपला केवळ तीन जागा मिळाल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

2. भाजप नेत्यांनी कोणावर आरोप केला आहे?
→ शिवसेना आमदार योगेश कदम यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

3. नाराज नेत्यांनी काय पाऊल उचलले आहे?
→ त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि इतर वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून जागा वाटप पुन्हा विचारात घ्यावी अशी मागणी केली आहे.

4. या पत्रात कोणकोणाची नावे आहेत?
→ देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे आणि नितेश राणे यांना हे पत्र पाठवले आहे.

5. भाजप नेत्यांची पुढील भूमिका काय आहे?
→ न्याय्य जागा वाटप न झाल्यास राजीनामा देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com