
रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील युतीच्या चर्चांना वेग आला असून यावर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गोगावले यांनी या निर्णयाची जबाबदारी पक्ष नेतृत्वावर सोपवलीय.
राष्ट्रवादीसोबत संभाव्य युतीच्या चर्चेमुळे रायगडमध्ये राजकीय तापमान वाढले आहे.
Raigad News : कोकणात रायगडमध्ये पालकमंत्रिपदावरून सुरू झालेला वाद युती तुटण्यापर्यंत आला आहे. शिवसेनेच्या आमदारांनी राष्ट्रवादीशी नाहीच अशी भूमिका घेतली आहे. पण आता स्वत: मंत्री भरत गोगावले यांनी यावर स्पष्टीकरण दिले असून त्यांनी महायुतीतील तिन्ही प्रमुख नेते जो निर्णय राज्यासाठी घेतील तो रायगडसाठीही लागू असेल असे म्हटले आहे. यामुळे राष्ट्रावीदी-शिवसेना युती होणार अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा काही केल्या सुटलेला नाही. यावरून जिल्ह्यात वाद आता विकोपाला जाताना दिसत आहे. अलिबागमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने-सामनेही आली होती. तर शिवसेनेचे महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीशी युती नाहीच अशी घोषणा करत महायुतीत फक्त दोनच पक्ष असल्याचे म्हटले होते. ज्यानंतर राष्ट्रवादीने देखील पलटवार करताना आम्हाला देखील शिवसेनेची गरज नाही असे म्हटले होते. अशा वार-प्रतिवारामुले जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच आता भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीशी युतीबाबत भाष्य केलं आहे.
गोगावले यांनी पत्रकार परिषदेत, राष्ट्रवादीला ज्या ज्या वेळी विरोध करण्याची वेळ होती. त्यावेळी विरोध केला आहे. पण आता स्थानिकच्या अनुशंगाने महायुतीचे तिन्ही प्रमुख मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार जो काय निर्णय सगळ्या महाराष्ट्रासाठी ठरवतील तोच रायगडसाठी देखील असेल.
वरच्या नेत्यांचा जो काही निर्णय होईल त्यानंतर आम्ही त्यावर चर्चा करू. काही ठिकाणी एखादा अपवाद असेल तेथे वेगळा विचार केला जाईल. सध्या जिल्ह्यात तीन आमदार शिवसेना, तीन आमदार भाजप आणि एक आमदार राष्ट्रवादीचा आहे. तर जागा 59 आहेत. तर या 59 ची बेरीज करून आमचे ज्या तीन जागा राहतात त्यांचाही निर्णय घेतला जाईल.
पण युतीबाबत वरूनच निर्णय झाल्यानंतर या गोष्टी होतील. कारण प्रत्येकाला वाटते की आप आपल्या आमदारकीच्या क्षेत्रातले आपले सदस्य निवडून यावेत. येथे युतीतील सात आमदार असल्याने असे प्रत्येकालाच वाटतं आहे. त्यामुळे सध्याच्या 59 जागा आणि सात आमदारांच्या बेरजेप्रमाणे आठ जागा वाट्याला येतील. पण सध्याच्या स्थितीती महायुतीत 3+3+1 अशी आमदारांची आहे. विरोधक आमदार नसल्यामुळे आम्हाला काहीही अडचण वाटत नाही.
मनसेचं संपली...
तसेच रायगड जिल्ह्यातील ग्रामीण असो की शहरी भाग येथे मनसेचं म्हणावे तेवढं प्राबल्य आता राहिलेलं नाही. कारण बरेचसे मनसेचे लोक काही शिवसेनेबरोबर तर काही बीजेपी बरोबर गेले आहेत. तर काही राष्ट्रवादीबरोबरही गेले आहेत. तळकोकणात तर मनसेची स्थिती बिकट अशी झाली आहे. तेथे वैभव खेडेकर यांच्यासारखे नेतेही आता भाजपसोबत गेले आहेत. त्यामुळे आगामी स्थानिकमध्ये मनसेची फार मोठी अडचण होणार नाही.
1. रायगडमध्ये युतीच्या चर्चा का सुरू आहेत?
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही पक्ष स्थानिक निवडणुकांसाठी एकत्र येण्याच्या शक्यतेवर विचार करत आहेत.
2. भरत गोगावले यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली?
त्यांनी सांगितलं की “वरचे नेते जो निर्णय घेतील तोच आम्हाला मान्य असेल.”
3. या युतीमध्ये आदिती तटकरे यांची भूमिका काय आहे?
आदिती तटकरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या असून रायगड जिल्ह्यात प्रभावशाली आहेत.
4. या चर्चांचा परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ शकतो का?
होय, युती झाल्यास स्थानिक सत्तासमीकरणांवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
5. गोगावले यांनी स्पष्ट भूमिका घेतली का?
त्यांनी वैयक्तिक भूमिका न घेता निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोपवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.