

रायगड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव वाढला आहे.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नाव न घेता आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
या वक्तव्यानंतर रायगड जिल्ह्यात महायुतीतील अंतर्गत मतभेदांवर चर्चेला उधाण आले आहे.
Raigad News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधीच रायगडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. येथे जस जसे स्थानिकच्या निवडणुका जवळ येतील तसे येथे शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद वाढताना दिसत आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी देखील आपला रोख कायम ठेवत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदाराला थेट इशाराच दिला आहे. तसेच कोणाचा कधी हिशोब चुकता करायचा हे मला चांगलेच माहित असल्याचेही म्हटलं आहे. यामुळे आता येथील राजकीय वातावरण पुन्हा तापण्यास सुरूवात झाली आहे. तटकरे यांनी हा इशारा कर्जतमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आढाव्यानंतर सभेतून दिला आहे.
जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमांधील वाद काही केल्या कमी होताना दिसत नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर टीकेची भडमार केल्यानंतर आता युती नको असा सूर शिंदेंचे आमदार आळवताना दिसत आहेत. यात आमदार महेंद्र थोरवे पुढे असून त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीशी युती होणार नाही असेच म्हटलं आहे.
तसेच थोरवे यांनी अनेकदा आपल्या तिखट शब्दातून तटकरे यांच्यावर टीका केली आहे. पण आता याच टीकेचा तटकरे यांनी समाचार घेत थेट इशारा दिला आहे. त्यांनी पुन्हा एकदा थोरवे यांना डिवचले आहे. यापूर्वी, तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांची नक्कल करत पालकमंत्री पद आणि जिल्ह्यातील राजकारणावरून शिवसेनेला खडेबोल सुनावले होते.
आता नाव न घेता तटकरे यांनी थोरवे यांना डिवचलं आहे. त्यांनी, कोणाचा हिशोब कधी चुकता करायचा ते मला चांगलच माहीत आहे, असा दिला आहे. या इशाऱ्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वादात आणखीन भर पडण्याची शक्यता वर्तवली जातेय.
यावेळी तटकरे यांनी, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला असून सध्याच्या परिस्थितीत कोणी कोणावर भाष्य करू नका असे म्हटलं आहे. तसेच पक्षाच्या प्रक्रियेद्वारे प्रत्येकाला योग्यवेळी संधी दिली.
त्यामुळे आपली योग्य भूमिका ठेऊनच भाष्य करा, असा सल्ला त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. दरम्यान नुकताच शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या सुनील पाटील यांना राष्ट्रवादीकडून खोपोली नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
1. रायगडमध्ये कोणत्या पक्षांमध्ये वाद सुरु झाला आहे?
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद वाढला आहे.
2. सुनील तटकरे यांनी कोणावर टीका केली?
तटकरे यांनी नाव न घेता आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
3. या वादाचा निवडणुकांवर काय परिणाम होऊ शकतो?
या वादामुळे महायुतीतील एकीवर परिणाम होऊन स्थानिक निवडणुकीत अडचणी येऊ शकतात.
4. वादाची पार्श्वभूमी काय आहे?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवार आणि सत्ता समीकरणांवरून वाद उद्भवला आहे.
5. रायगडमधील राजकीय वातावरण सध्या कसे आहे?
रायगडमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील मतभेदांमुळे राजकीय तापमान वाढले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.