
20 वर्षांनी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या मनसे-शिवसेना युतीला बेस्ट पतपेढीत मोठा पराभव पत्करावा लागला.
हा पराभव आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.
भाजप नेते नारायण राणेंनी ठाकरेंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल करत “राजकारण संपलं” असा टोला लगावला.
Mumbai News : गेल्या 20 वर्षापासून लांब असणारे ठाकरे बंधू मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र आले. त्यानंतर महाराष्ट्र नव निर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात युती होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी यानंतर शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला होता. तर या युतीची चाचपणी ठाकरेंकडून बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत करण्यात आली. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत केलेली युती ठाकरे बंधूंसाठी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची लिटमस टेस्ट मानली जात असताच ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला. हा पराभव ठाकरे बंधुंना मोठा धक्का मानला जात आहे. अशातच भाजपचे तळ कोकणातील नेते तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी जोरदार निशाना साधला आहे. त्यांनी ठाकरे बंधुंच्या युतीवर हल्लाबोल करताना, ठाकरेंचे राजकारणच संपलं आहे. आता त्यावर बोलण्याच रस नसल्याचे म्हटलं आहे.
राज्यात आगामी स्थानिकच्या मोर्चे बांधणीला वेग आला आहे. अशातच ठाकरे बंधुंच्या युतीबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीच अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र त्यांच्या युतीबाबत होणाऱ्या सततच्या चर्चेवरून दोन्ही पक्षासह सत्ताधारी पक्षातीलल नेतेही संभ्रमात असतात. अलिकडेच ठाकरे बंधुंची एकमेकांसह भाजप आणि शिवसेना नेत्यांबरोबर झालेल्या भेटींमुळे ते भाजपशी हातमिळवणी करतील अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या. मात्र या शक्यता सध्या धुसर होताना दिसत असून मनसे आणि शिवसेना एकत्र येताना दिसत आहे. त्यामुळेच मनसे आणि शिवसेनेच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे.
यावरून आता नारायण राणे यांनी ठाकरे बंधुवर जोरदार निशाना साधला आहे. त्यांनी, त्यांनी कोण कोणाच्या घरी गेल्याने काय फरक राजकारणार पडणार आहे, असा सवाल केला आहे. जे बेस्ट निवडणुकीत झालं. जो निकाल तेथे लागला तोच निकाल सगळीकडे लागणार असल्याचा दावा नारायण राणेंनी केलाय.
तसेच राणेंनी ठाकरेंचं राजकारण संपलंय. त्यामुळे कोण कोणाकडे गेलं कुठे गेलं यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला ठाकरेंच्या राजकारणात रस नाही. तुम्ही कशाला सारखं त्यांना दाखवता असाही संताप यावेळी राणेंनी व्यक्त केला आहे.
प्रश्न 1: ठाकरे बंधूंची युती कोणत्या निवडणुकीत तपासली गेली?
उत्तर: बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत.
प्रश्न 2: या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा काय निकाल लागला?
उत्तर: त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला.
प्रश्न 3: नारायण राणेंनी काय विधान केलं?
उत्तर: त्यांनी म्हटलं की, ठाकरेंचं राजकारण आता संपलं आहे.
प्रश्न 4: या युतीला कोणती निवडणूक ‘लिटमस टेस्ट’ मानली जात होती?
उत्तर: आगामी मुंबई महापालिका निवडणूक.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.