
Mumbai News : मराठी भाषा गौरव दिनाच्या दुसऱ्या दिवशी राज्य सरकारने धक्कादायक निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या तब्बल 17 हजार 500 शाळा बंद करण्यावर किंवा समायोजन करण्यावर विचारविनिमय सुरू असल्याची माहिती आहे. यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं आहे. साम वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान, अद्यापपर्यंत शासन पातळीवर असा कोणाताही निर्णय झाला नसल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी काही दिवासंपूर्वी दिली होती. साधारणपणे लहान मुले सामुदायिक पद्धतीने जास्त अभ्यास करतात, असे शास्त्र सांगते. त्यामुळे जास्ती विद्यार्थ्यांची संख्या असली तरी तर त्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली राहते. जिथे एक, दोन किंवा तीनच मुले आहेत, अशा काही ठिकाणी पालक आणि शिक्षण तज्ज्ञांच्या सूचना आहेत.
यामुळे त्याच्या जवळपास आपण काही सुविधा करून त्या विद्यार्थ्यांची व्यवस्था करू शकतो का? या संदर्भातील अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे भुसे यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, आता याच समितीचा अहवाल आला असल्याचे सांगितले जात आहे.
यानुसारच राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या तब्बल 17 हजार 500 शाळा बंद करण्यावर किंवा समायोजन करण्यावर विचारविनिमय सुरू असल्याची माहिती आहे. यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.