
Mumbai News, 08 Jul : मीरा-भाईंदर येथे मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि इतर मराठी संघटनांनी काढलेल्या मोर्चा दरम्यान निर्माण झालेल्या गोंधळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकदा वेगळं आणि दुसऱ्यांदा वेगळं बोलतात त्यांचं वागणं हे ओरिजनल भारतीय जनता पक्षाला शोभणार नाही, अशा शब्दात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.
मीरा-भाईंदर येथे निर्माण झालेली परिस्थिती आणि मोर्चा दरम्यान झालेला गोंधळ यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी फडणवीसांवर टीका केली. या सर्व घटनेला राज्याचे मुख्यमंत्री जबाबदार असून हिंदी सक्ती भाजपनेच केली होती, असंही त्यांनी म्हटलं आहे.
माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, "एकीकडे आज सरन्यायाधीश भूषण गवई महाराष्ट्रात आहेत. दुसरीकडे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, अशावेळी गृहखातं काय करतंय? त्यामुळे या घटनेला गोंधळाला फक्त आणि फक्त गृहखातं आणि मुख्यमंत्री जबाबदार आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकदा वेगळं आणि दुसऱ्यांदा वेगळं बोलतात ही सगळ्यात मोठी अडचण आहे. भाजप हा सुसंस्कृत राजकीय पक्ष आहे असं मी समजत होते. मात्र दुर्दैवाने गेल्या काही दिवसांमध्ये त्यांचं वागणं मग ते भाषा, प्रांत, वागणूक आणि ज्या धमक्या दिल्या जात आहे, हे ओरिजनल भाजपला शोभणारं नाही.
हे न शोभणारं कल्चर भाजपमध्ये कुठून येत आहे?" असा सवाल उपस्थित करत हे लोकशाहीला शोभणारी बाब नाही, असंही सुळे यावेळी म्हणाल्या. दरम्यान, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचा गट म्हणतो की हिंदी सक्ती आम्ही केलेली नाही. त्यामुळे ही सक्ती भाजपनेच केली असून या सर्व परिस्थितीला भारतीय जनता पक्षच जबाबदार असल्याचंही सुळे यांनी यावेळी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.