Manikrao Kokate : "मी माझ्या मित्राशी मस्करीत..."; कृषीमंत्री कोकाटेंचं शेतकऱ्यांबाबत आधी वादग्रस्त वक्तव्य नंतर सारवासारव, नेमकं काय म्हणाले?

Manikrao Kokate apology : कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचं तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाचीतरी गुंतवणूक आहे का?" असा सवाल राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका शेतकऱ्याला विचारला होता. शिवाय शेतकरी पीक विम्याच्या पैशांतून साखरपुडे आणि लग्न करतात, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं.
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate Statement : "कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचं तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाचीतरी गुंतवणूक आहे का?" असा सवाल राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी एका शेतकऱ्याला विचारला होता. शिवाय शेतकरी पीक विम्याच्या पैशांतून साखरपुडे आणि लग्न करतात, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं.

त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले आहेत. विरोधकांनी कोकाटे यांच्यावर कडाडून टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. चोहोबाजूंनी टीका होताच आता कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मी माझ्या शेतकरी मित्राशी थट्टा मस्करीत बोलत होतो, माझ्या वक्तव्याचा इतर शेतकऱ्यांशी संबंध नाही अशी सारवासारव त्यांनी केली आहे.

माणिकराव कोकाटे नेमकं काय म्हणाले होते?

नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या माणिकराव कोकाटे यांना एका शेतकऱ्याने कर्जमाफी विषयी प्रश्न विचारला होता. यावर बोलताना ते म्हणाले, जे नियमितपणे कर्ज भरतात त्यांनी भरावं.

Manikrao Kokate
Babasaheb Manohare : मोठी बातमी! महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरेंनी स्वत:वर गोळी झाडली, प्रकृती चिंताजनक

कर्ज घ्यायचं आणि पाच ते दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहायची. तोपर्यंत काही भरायचं नाही. कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला मिळणाऱ्या पैशांचं तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाचीतरी गुंतवणूक आहे का? असा सवाल त्यांनी संबंधित शेकऱ्याला केला होता. शिवाय सरकार तुम्हाला शेतीमध्ये गुंतवण्यासाठी पैसे देतं.

शेतकरी (Farmer) म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा, असंही ते यावेळी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्यानंतर आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

Manikrao Kokate
Devendra Fadnavis: भिसे कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी घेतली मोठी जबाबदारी; 'त्या' दोन चिमुकल्या मुलींचा उपचार..

कर्जमाफी होणार नाही असं म्हटलंच नाही - कोकाटे

आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करताना ते म्हणाले, मी शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही असं मी म्हटलंच नाही. शेतकऱ्यांना कायमस्वरुपी सक्षम करणं ही काळाची गरज आहे असं मी म्हटलं. शेतकरी समृद्ध कसा होईल, त्याचा भांडवली खर्च कसा कमी होईल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. काल मी ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे तिथे पाहणीसाठी गेलो होतो.

नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याचे आदेश दिलेत. नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही असे मी म्हणालो नाही. मी ज्या शेतकऱ्याशी बोलत होतो, तो माझा मित्र आहे. त्याच्याशी थट्टा मस्करीत मी बोलत होतो. माझ्या त्या वक्तव्याचा इतर शेतकऱ्यांशी काहीही संबंध नाही, असं स्पष्टीकरण कोकाटेंनी दिलं आहे. शिवाय कर्जमाफी करणार नाही असं मी कुठंही म्हटलं नाही. तो विषय माझा नाही असं मी म्हणालो असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com