
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर चंद्रकांत पाटील यांनी ‘हे आंदोलन फक्त राजकीय आरक्षणासाठी’ असल्याचा दावा केला.
या दाव्याला जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर देत चंद्रकांत पाटील यांना “अक्कल आहे का?” असा सवाल केला.
“लय वचवच करू नका अन्यथा…” असा इशारा देत जरांगे पाटलांनी थेट पलटवार केला.
Mumbai News : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर पंढरपूर येथे प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी त्यांनी मोठा दावा करताना आरोपही केले होते. पाटील यांनी जरांगे पाटलांचे हे आंदोलन फक्त राजकीय आरक्षणासाठीच सुरू आहे. त्यासाठीच त्यांनी धडपड सुरू असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही असा दावा केला होता. या आरोप आणि दाव्यानंतर आता जरांगे पाटलांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी, चंद्रकांत पाटील तुम्हाला अक्कल आहे का? असा सवाल करताना लय वचवच करू नका अन्यथा... असाही इशारा दिला आहे.
चंद्रकांत पाटील पंढरपूरमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले असताना त्यांनी मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाबाबत भाष्य केले. ते म्हणाले, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही. पण, जरांगे पाटील हे सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरत आहेत. तर हे आंदोलन फक्त गावच्या सरपंच पदासाठी आणि राजकारणासाठी सुरू असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. ज्यानंतर मराठा आरक्षण आंदोलकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
यादरम्यान आज जरांगे पाटील यांनी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला त्यांनी, चंद्रकांत पाटील मराठा उपसमितीचे अध्यक्ष असताना काय खेळ खेळलेत? मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन मराठा तरुणांच्या व्हॅलिडिटी कशा रोखून धरल्या याची सर्व माहिती आम्हाला आहे. त्यामुळे उगाच वचवच करून विनाकारण मराठ्यांच्या शिव्या खाऊ नका, असा इशारा दिला आहे.
चंद्रकांत पाटलांनी मधल्या काळात आमच्या पोरा-बाळांचं चांगल काम केलं, त्यामुळे आम्ही काहीही बोलत नव्हतो. पण आता त्यांनी बोलू नये. नीट राहावं, कारण त्यावेळी मराठा उपसमितीचा अध्यक्ष तूच होता. त्या काळात त्यानं व्हॅलिटीडी कशा रोखल्या होत्या? याची आम्हाला माहिती आहे. मराठ्यांच्या शिव्या खाऊ नकोस. इथून पुढे मराठा आरक्षणाच्याविरोधात बोलू नकोस. इथून पुढे वचवच नको, तू फार काही लांब नाही. कोल्हापूर म्हणजे तू आमच्या राजघराण्याच्या कचाट्यात असल्याचा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला आहे.
तसेच चंद्रकांत पाटलाला अक्कल आहे काय? असती तर समितीवरून काढून टाकलं नसतं, असे म्हणत फक्त पुढच्या शनिवारी आणि रविवारी थांबा. बघा मुंबईत किती गर्दी होते असा इशाराही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
प्र.१. चंद्रकांत पाटील यांनी काय दावा केला होता?
उ. त्यांनी जरांगे यांचे आंदोलन फक्त राजकीय आरक्षणासाठी आहे, असे सांगितले होते.
प्र.२. जरांगे पाटलांनी चंद्रकांत पाटलांना काय प्रत्युत्तर दिलं?
उ. त्यांनी थेट सवाल केला – “चंद्रकांत पाटील तुम्हाला अक्कल आहे का?”
प्र.३. जरांगे पाटलांचा इशारा काय होता?
उ. त्यांनी चंद्रकांत पाटलांना “लय वचवच करू नका अन्यथा…” असा इशारा दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.