Abdul Sattar : ...अन् त्यादिवशी मुख्यमंत्र्यांशी माझा करार संपेल; अब्दुल सत्तारांचं मोठं विधान

Abdul Sattar on Eknath Shinde : "एकनाथ शिंदेंचे नऊ रत्न होते मात्र त्यातील आता एक रत्न कमी झाले असून आम्ही आठ राहिलो आहोत. त्यात मी देखील आहे. शिवाय एक रत्न आम्ही दिल्लीला पाठवलं."
Eknath Shinde, Abdul Sattar
Eknath Shinde, Abdul SattarSarkarnama

Shivsena News : लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचा आपण उघडपणे पराभव केल्याचं वक्तव्य करणारे शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी एक मोठं विधान केलं आहे.

जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना माझ्यावर विश्वास असेल तोपर्यंत माझ्या हातात धनुष्यबाण असेल सत्तार यांनी म्हटलं आहे. सत्तार यांच्या या वक्तव्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

सत्तार म्हणाले, "मी विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर टोपी काढणार आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा माझ्यावर विश्वास असेल तोपर्यंत माझ्या हातात धनुष्यबाण असेल. शिवाय जेव्हा ते म्हणतील तुम्ही माझ्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, त्यादिवशी आमचा करार संपेल." तर आता सत्तार यांच्या या वक्तव्यामुळे नवीन राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Eknath Shinde, Abdul Sattar
Bjp Core Committee : एकनाथ शिंदे अन् अजितदादांबद्दल भाजपच्या बैठकीत मोठा निर्णय

तसंच, एकनाथ शिंदेंचे नऊ रत्न होते मात्र त्यातील आता एक रत्न कमी झाले असून आम्ही आठ राहिलो आहे. त्यात मी देखील आहे. शिवाय एक रत्न आम्ही दिल्लीला पाठवलं असल्याचंही सत्तार म्हणाले.

मुख्यमंत्री सांगतील तेव्हा पालकमंत्री

दरम्यान, यावेळी बोलताना सत्तार यांनी संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदावर शिवसेनेचा (Shivsena) दावा कायम ठेवला आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाट्याला छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीपद आले आहे. त्यामुळं बाकीच्यांनी बोलू नये, जेव्हा मुख्यमंत्री सांगतील तेव्हा पालकमंत्री होईल, अशा शब्दात त्यांनी संभाजीनगरचे पालकमंत्री शिवसेनेचेच असल्याचा दावा केला. शिवाय मलाही पालकमंत्री होण्याची इच्छा आहे असं त्यांनी सांगितलं.

Eknath Shinde, Abdul Sattar
Nana Patole News : सरकारलाच आता तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ; नाना पटोलेंचा सत्ताधाऱ्यांना टोला

सध्या फक्त मुख्यमंत्री शिंदे यांची हवा आहे. मी पैलवान असून कुणासोबत तरी लढायचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही मुस्लिम समाजाच्या भावना कळवल्या आहेत. निजाम सरकारच्या काळात देखील मुस्लिमांना जेवढा निधी मिळाला नाही, तेवढा महायुती सरकारमध्ये मिळाला. मुस्लिम आरक्षणाची आम्ही मागणी केली असून आम्हाला योग्य न्याय मिळेल असा विश्सवासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com