Imtiaz Jaleel On Thackeray : देर आये दुरुस्त आये! ठाकरे बंधुंना एकत्र येण्यावाचून पर्याय नव्हता..

AIMIM MP Imtiaz Jaleel welcomed the reunion of Thackeray brothers, saying "better late than never," hinting at the political significance of their coming together. : कधीकाळी उद्धव आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांवर सडकून टीका करणारा एमआयएम आणि त्या पक्षाचे राज्यातील नेते यांनीही दोन भावांच्या एकत्र येण्याच्या निर्णयाचे स्वागत केले.
Imtiaz Jaleel On Thackeray Brothers News
Imtiaz Jaleel On Thackeray Brothers NewsSarkarnama
Published on
Updated on

AIMIM News : राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याने राज्याच्या राजकारणात विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावर 'देर आये दुरुस्त आये' म्हणत स्वागत केले आहे. दोघांनाही एकत्र येण्यावाचून काही पर्यायच नव्हता, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्राची सत्ता आणि मराठी भाषा, माणूस टिकवायचा असेल तर राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी राज्यातील मराठी माणसांची इच्छा होती. ती कालच्या प्रयत्नातून पूर्ण झाली, असेच म्हणावे लागेल. (Raj Thackeray) राज ठाकरे यांची शैली, कामाची पद्धत वेगळी आहे, तर उद्धव ठाकरे हे शांत, संयमी स्वभावाचे असल्याचे सांगत दोघांनी आता महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र राहावे, अशी इच्छाही इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली.

काही दिवसांपुर्वीच इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाराष्ट्रातून भाजपाला संपवायचे असेल तर राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र आले पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर काल मुंबईत ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याचा सोहळा पार पडला. भाजपाने यावर हा म महापालिकेच्या सत्तेसाठीचा सोहळा असल्याची टीका केली. तर अनेक राजकीय पक्षांनी या दोन भावांच्या एकत्र येण्याचे स्वागत केले.

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers News
Imtiaz Jaleel On Thackrays : इम्तियाज जलील म्हणतात, भाजपाला संपवायचे असेल तर राज-उद्धव ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे!

कधीकाळी उद्धव आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांवर सडकून टीका करणारा एमआयएम आणि त्या पक्षाचे राज्यातील नेते यांनीही दोन भावांच्या एकत्र येण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. इम्तियाज जलील यांनी यावर भाष्य करताना महाराष्ट्र, मराठी आणि सत्ता हवी असेल तर मतभेद बाजूला सारून एकत्र आलं पाहिजे याची जाणीव दोन्ही ठाकरेंना झाली असेल. शिवाय राज्यातील प्रत्येक मराठी माणसाची देखील ती इच्छा होती, त्यानूसार हे दोन भाऊ काल एकत्र आले आहेत.

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers News
Raj uddhav thackeray : एक मेळावा, दोन ठाकरे अन् तीन प्रश्न! महाराष्ट्रातील जनतेला उत्तर कोण देणार?

दोघांची कार्यपद्धतीन भिन्न आहे, एक आक्रमक तर एक शांत संयमी. दोघांनी राज्यात कुठलाही तणाव, हिंसा वाढणार नाही याची काळजी घेत राज्याच्या हितासाठी जे योग्य असेल त्या मार्गाने पुढे जावे, हीच आमची अपेक्षा आहे, असेही इम्तियाज जलील म्हणाले. एकनाथ शिंदे व त्यांच्या पक्षाकडून ठाकरेंच्या एकत्र येण्यावर होणारी टीका सहाजिक आहे. शिवसेना पक्ष फोडून जे त्यांना साध्य करायचे होते, त्यात आता अडथळे आले आहेत.

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers News
Imtiaz Jaleel News : छत्रपती संभाजीनगरमध्ये रमाई घरकुल योजनेत शंभर कोटींचा घोटाळा! इम्तियाज जलील यांनी बाॅम्बची वात पेटवली..

शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेकडून धोका वाटू लागला आहे. ज्या शिंदे आणि त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांना धोका दिला, ते उद्या आपल्यालाही सत्तेच्या खुर्चीसाठी धोका देतील, याची जाणीव फडणवीस यांना झाली आहे. त्यामुळे ते एकनाथ शिंदे यांना दूर ठेवू पाहत आहेत, असा दावाही इम्तियाज जलील यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com