
Mumbai news: राज व उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा गेल्या चार महिन्यापासून सुरू होत्या. त्या चर्चेला दोन्ही भाऊ एकत्र आल्याने पूर्णविराम मिळाला आहे. तब्बल 20 वर्षांनी या मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र आले. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते तर घोषणांनी वरळी डोमचा परिसर दुमदुमून गेला होता. 20 वर्षानंतर त्यांचे कार्यकते एकमेकांना भेटताना एक वेगळा आनंद दिसत होता. या मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र असले असले तरी महाराष्ट्रातील जनतेला पडलेल्या तीन प्रश्नाचे उत्तर कोण देणार? असा प्रश्न पडला आहे.
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षाकडून तयारी केली जात आहे. ठाकरे बंधूनी आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून पावले उचलली आहेत. त्यामुळे येत्या काळात त्याचा कितपत परिणाम होणार याची उत्सुकता सर्वानाच लागली आहे. राज व उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) एकत्र आले असले तरी जनतेला काही प्रश्न सतावत आहेत.
महापालिका निवडणुकासाठी युती करणार का ?
आगामी कळत होत असलेल्या मुंबई महापलिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना व मनसे (MNS) युती करणार का ? याची उत्सुकता लागली असली तरी या मेळाव्यातून स्पष्टता येत नाही. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार का यावर उद्धव ठाकरेंनी सकारात्मकता दाखवली असले तरी राज यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. या मेळाव्यात महापालिका एकत्र लढवण्याची घोषणा होईल असे वाटत होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे येत्या काळात ठाकरे बंधू काय भूमिका घेणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे बाहेर पडणार का?
येत्या काळात ठाकरे बंधू एकत्र येणार असले तरी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत काहीच वक्तव्य केले नाहीत. दुसारीकडे वरळीत पार पडलेल्या विजयी मेळाव्याला काँग्रेसच्या नेत्याने दांडी मारली. पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. दुसऱ्याा पक्षांचे नेते मेळाव्याला उपस्थित होते, त्यांचा व्यासपीठावर बोलवून सन्मान करण्यात आला. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे काय होणार? उद्धव ठाकरे आघाडीतून बाहेर पडून मनसेसोबत युती करणार का असा प्रश्न विचारला जात आहे.
फडणवीस, एकनाथ शिंदेंची साथ राज ठाकरे सोडणार का ?
विजयी मेळाव्यातून जोरदार भाषण करताना राज ठाकरेंनी विरोधकांची पिसे काढली. मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही भाऊ एकत्र आले असले तरी युतीबाबतची घोषणा त्यांनी केली नाही. यावेळी राज ठाकरेंनी बाळासाहेबांना जे जमले नाही ते फडणवीसांना जमले असे म्हणत टोलेबाजी केली. दुसरीकडे त्यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली नाही. तर एकनाथ शिंदेंनीही राज ठाकरेंवर टीका केली नाही, उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. त्यामुळे येत्या काळात राज ठाकरे हे शिंदे, फडणवीसांची साथ सोडणार का? असा सवाल विचारला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.