
Dharashiv News, 21 Feb : राज्यातील महिलांना आणि ज्येष्ठांना विविध सवलती दिल्यामुळे एसटी तोट्यात आल्याचं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री असताना महिलांना एसटी (ST Bus) प्रवासात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
पण या योजनेमुळे एसटी तोट्यात गेल्याचं राज्य सरकार मान्य करत नव्हतं. मात्र, आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनीच एकप्रकारे या योजनांमुळे एसटी तोट्यात गेल्याचं कबुल केलं आहे. मागील सरकारने महिला आणि जेष्ठांसाठी विविध योजना लागू केल्या होत्या.
यामध्ये एसटीच्या प्रवासात महिलांना 50 टक्के सवलत देण्यात आली होती. शिवाय जेष्ठांसाठी देखील विविध सवलती देण्यात आल्या होत्या. मात्र, या सर्व सवलतीमुळे एसटीला दररोज 3 कोटींचा तोटा होत असल्यामुळे यापुढे एसटीमध्ये कोणतीही नवी सवलत दिली जाणार नसल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केलं.
ते धाराशिवमधील व्हाईस ऑफ मेडिया या पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पत्रकारांना एसटीमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रताप सरनाईक यांनी अशा सवलतींमुळेच एसटी तोट्यात गेल्याचं सांगितलं.
ते म्हणाले, "महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेल्या सवलतींमुळे एसटीला दर दिवशी 3 कोटी रुपयांचा तोटा होतोय. त्यामुळे यापुढे एसटीमध्ये कोणतीच सवलत दिली जाणार नाही. लाडक्या बहिणींना बसमध्ये 50% सवलत ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली आहे.
अशा सवलती सर्वांना देत बसलो तर महामंडळ चालवणं कठीण होईल, त्यामुळे सध्या या मागणीचा विचार करू शकत नाही. गाव-खेड्यापर्यंत ज्या भागात एसटी जात नाही, त्या भागात एसटी पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.